Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Antarwali Sarati Meeting : महाजनांनी जरांगेंना काय सांगितले...‘आता देवसुद्धा मराठ्यांना ओबीसीत येण्यापासून रोखू शकत नाही’

Vijaykumar Dudhale

Jalna News : राज्यात मराठ्यांच्या ५४ लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठ्यांना ओबीसींमध्ये येण्यापासून आता देवसुद्धा रोखू शकत नाहीत, असे राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच, ओबीसींमध्ये मराठा पहिल्यापासून आहेत. तसेच, न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. (Marathas first in OBCs; Therefore, first right on reservation is Maratha's : Manoj Jarange Patil)

अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाची बैठक होत आहे. त्या बैठकीत बोलताना जरांगे पाटील यांनी प्रत्येक मुद्या सविस्तर समजावून सांगितला. त्यावेळी जरांगे यांनी शिंदे समिती, गिरीश महाजन यांचा दावा, ओबीसींमध्ये मराठे प्रथमपासून असल्याची दावा केला आहे. ते म्हणाले की, मराठ्यांचा ओबीसींमध्ये समाविष्ठ करावा, अशी मराठा समाजाची मुख्य मागणी होती. गायकवाड आयोगानुसार मराठा समाज हा मागास असल्याचे सिद्ध झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठ्यांच्या ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. म्हणजे मराठा हा ओबीसी आरक्षणामध्ये आहे. पण आम्हाला ओबीसीमध्ये येऊ नका, कसं सांगता. मराठ्यांच्या ओबीसी नोंदी सापडल्या असतील, तर त्यांना ओबीसीमध्ये येण्यापासून कोण रोखणार आहे. गिरीश महाजन म्हणाले की, आता देवसुद्धा मराठ्यांना ओबीसींमध्ये येण्यापासून रोखू शकत नाहीत. मग तुम्ही विरोध करणारे कोण, असा सवालही त्यांनी केला.

जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, असे म्हणतात. पण ओबीसीमध्ये सर्वांत आधी मराठेच आहेत. तुम्ही नाहीत. तुम्हाला सरकारने नंतर आरक्षण दिले आहे. मराठे आधीच ओबीसींमध्ये आहेत. त्यामुळे त्या आरक्षणावर मराठ्यांचा पहिला हक्क आहे. एसी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी यांच्या आरक्षणाला आपल्या मागणीमुळे धक्का लागत नाही. कारण, त्यांचा ओबीसीमधून वेगळा प्रवर्ग केलेला आहे.

ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देणार, असे सरकार म्हणत असेल तर ती मराठ्यांची फसवणूक आहे. मतांसाठी तुम्ही मराठ्यांचे मुडदे पाडणार का, असा सवालही जरांगे पाटील यांनी केला. ओबीसींचं काढून आम्ही घेणार नाही. तेवढी दानत मराठ्यांमध्ये आहे. आपण त्यांचं घेत नाही, तर आपलं स्वतचं घेत आहोत. आपलं आरक्षण ओबीसींकडे आहे, ते आपल्याला देत नाही. त्याचा विचार मराठ्यांना आता करायची वेळ आली आहे. आमच्या नोंदी सापडल्या आहेत, तर आरक्षण का नाकारता, असा सवालही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT