Marathwada Sugarcane News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Sugarcane News : अडीच हजारांची पहिली उचल अन् `आरएसएफ`प्रमाणे भावाची हमी; आंदोलन स्थगित...

Laxmikant Mule

Marathwada Political News : माजी मंत्री अमित देशमुख यांच्या शिवडी (ता. लोहा, जिल्हा नांदेड) येथील खासगी कारखान्यांच्या परिसरात सुरू करण्यात आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. (Marathwada Sugarcane News) कारखाना प्रशासन व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अडीच हजार रुपयांची पहिली उचल व आरएसएफप्रमाणे जी रक्कम होईल ती देण्यात येईल, अशी लेखी हमी कारखाना प्रशासनाने दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

त्यामुळे बंद झालेले गाळप पुन्हा सुरू झाले आहे. या कारखान्याच्या परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पहिली उचल २७०० व अंतिम भाव तीन हजार या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी (ता. १६) ठिय्या आंदोलन सुरू केले होते. (Sugarcane FRP) ऊस उत्पादक शेतकरी व कारखाना प्रशासन यांच्यात चर्चा सुरू झाली, पण पहिल्या दिवशी या मागणीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते.

या मागणीबाबत शुक्रवारी (ता. १७) पुन्हा एकदा शेतकरी व कारखाना प्रशासन यांच्यात सायंकाळी चर्चा झाली. (Nanded) या चर्चेत चालू गाळप हंगामात पहिली उचल अडीच हजार व आरएसएफ (रेव्हेन्यू शेअरिंग फार्म्युला) प्रमाणे जो निघेल, त्याप्रमाणे भाव देण्याचे लेखी पत्र कारखाना प्रशासनाने दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. (Marathwada) मराठवाड्यात गाळप हंगाम सुरू होऊन सोळा दिवस झाले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. याचे लोण हळूहळू मराठवाड्यात पसरत आहे. यंदा दुष्काळी तसेच ऊसटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने साखरेला जास्त भाव मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उसाला जादा भाव मिळण्यासाठी शेतकरी व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

त्यामुळे पहिली उचल व अंतिम भाव जास्त देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मराठवाड्यातील कारखानदारांनी यंदाच्या गाळप हंगामात पहिली उचल अडीच हजार देण्याची घोषणा केली आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना २७०० रुपये पहिली उचल व अंतिम भाव तीन हजार देण्यात यावा, अशी मागणी करत आहे. तसेच जर साखरेचा भाव पन्नास रुपये प्रतिकिलो झाला तर उसाला भाव वाढून देण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे.

माजी मंत्री अमित देशमुख यांच्या शिवडी येथील खासगी कारखान्याच्या परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दोन दिवस ठिय्या आंदोलन केले. कारखाना प्रशासनाने लेखी पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. तसेच येणाऱ्या काही दिवसांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आंदोलन करण्यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे यांनी दिली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT