Ncp Political News, Aurangabad
Ncp Political News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

NCP Latest News: राष्ट्रवादीच्या चव्हाणांचे मन पदवीधरमध्ये रमेना, विधानसभेसाठी तयारी सुरू?

सरकारनामा ब्युरो

Gangapur Political News : सलग तीनवेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांना आता विधानसभा निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत. Ncp पदवीधर निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीला चव्हाण आता वैतागले आहेत. खाजगीत ते तसे बोलूनही दाखवतात, त्यामुळे आता एखादा चांगला मतदारसंघ पाहून तिथून विधानसभेत जाण्याची तयारी चव्हाण यांनी सुरू केली आहे.

जिल्ह्यातील गंगापूर-खुल्तबाद मतदारसंघात गेल्या वर्षभरापासून चव्हाण यांचे दौरे वाढले आहेत. सध्या हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. प्रशांत बंब हे अपक्ष आणि दोनवेळा (Bjp) भाजपच्या तिकीटावर येथून निवडून आले आहेत. आता याच मतदारसंघातून नशिब आजमावण्याची चव्हाण यांची तयारी सुरू आहे. (Aurangabad) नेमकं गंगापूरमधूनच चव्हाण यांचा का लढायचंय तर भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे अन् पदवीधरचे सतीश चव्हाण या दोघांचीही कोंडी केली होती.

एवढेच नाही तर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची गरज नाही, ते रद्द केले पाहिजेत अशी खळबळजनक मागणी देखील बंब यांनी केली होती. त्यामुळे बंब यांनाच घरी बसवण्याची रणनिती तर राष्ट्रवादीची यामागे नाही ना? अशी देखील चर्चा आहे. प्रशांत बंब सलग तीन टर्म आमदार असल्यामुळे त्यांची मतदारसंघावर मजबुत पकड आहे. साम, दाम, दंड, भेद अशा कुठल्याही आव्हानाला बंब तोंड देवू शकतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार दिला तरच काही घडू शकते याची जाणीव राष्ट्रवादीला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघामुळे चव्हाण यांना प्रचार यंत्रणा राबवण्याचा दांडगा अनुभव असल्याने त्याचाही लाभ गंगापूर विधानसभा लढवतांना होईल, असे बोलले जाते. शिवाय तीनवेळा मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढल्यानंतर चौथ्यांदा चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी नवा भिडू नवा राजचे धोरण अंवलबू शकते. चव्हाण यांना पक्षाकडून तसे संकेत मिळल्यामुळेच त्यांचे गंगापूर-खुल्ताबाद भागात दौरे वाढल्याचे दिसून येते.

गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघात काॅंग्रेस, शिवसेनेने प्रत्येकी तीनवेळा तर अपक्षांनी दोनवेळा विजय मिळवलेला आहे. तर भाजपला या मतदारसंघात दोनदा यश मिळाले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने तरुण चेहरा म्हणून शिवसेनेतून पक्षात आलेल्या संतोष माने यांना उमेदवारी दिली होती. बंब यांच्यापुढे मानेंचा टिकाव लागणार नाही, असे वाटत असतांना ७२ हजार मते मिळवत त्यांनी भाजपला चांगली लढत दिली. पण बंब यांची रणनिती भेदण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले नाही.

परिणामी बंब ३५ हजार मतांची आघाडी घेवून विजयी झाले. त्यामुळे भाजपकडून हा मतदारसंघ खेचून घेणे राष्ट्रवादीला सोपे नाही एवढे मात्र निश्चित. शिवाय सतीश चव्हाण हे गेली १२-१३ वर्ष पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांचा संपर्क सर्वसामान्यांशी फारसा आलेला नाही.

विधानसभा जिकांयची असले तर तळागाळात, वाडे, वस्त्या, तांड्यावर देखील संपर्क आवश्यक असतो. वर्षभरापासून चव्हाण तयारी लागले आहेत, २०२४ च्या निवडणुकीला आणखी पावने दोन वर्षांचा कालवधी आहे. या दरम्यान, चव्हाण मतदारसंघात किती संपर्क वाढवतात, यावरच विधानसभेच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT