Ashok Chavhan, Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve : जालन्याहून 'वंदे भारत' सुरू; दानवेंना अशोक चव्हाणांच्या टीकेची आठवण...

Jagdish Pansare

Raosaheb Danve : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देशातील महत्त्वाकांक्षी वंदे भारत सुपर फास्ट रेल्वे जालना ते मुंबई सुरू केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना या मतदारसंघातून वंदे भारत सुरू करत दानवेंनी आपल्या विरोधकांची तोंडे बंद केली. या रेल्वेला नागरिकांकडून मोठा प्रतिसादही मिळतो आहे.

दरम्यान, रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी सरकारनामाला दिलेल्या विशेष मुलाखतील वंदे भारत रेल्वेसंदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्री काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांना टोला लगावण्याची संधी हेरलीच. गेल्या वर्षी जालना (Jalna) जिल्ह्यातील घनसावंगी येथे भरवण्यात आलेल्या मराठा साहित्य संमेलनात अशोक चव्हाण यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडून आपल्याला फारशा अपेक्षा नसल्याचे म्हणत टीका केली होती.

रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री असले तरी त्यांच्याकडून मला फारशा अपेक्षा नाहीत. त्यांनी फक्त मराठवाड्यातील रेल्वेसाठी स्वच्छ आणि अतिरिक्त डबे दिले तरी खूप झाले, असा चिमटा काढला होता. आता जालन्याहून वंदे भारत सुरू केल्यानंतर दानवे यांनी चव्हाण यांच्या त्या टीकेला उत्तर दिले. विरोधक म्हणून अशोक चव्हाण यांनी मराठी साहित्य संमेलनात त्यावेळी केलेल्या टीकेचे मला वाईट वाटले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधकांचे काम टीका करणे हेच असते. त्यामुळे टीकेलाही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. त्यांनी मराठवाड्यासाठी स्वच्छ व अतिरिक्त डबे मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांनी अतिरिक्त डबे मागितले होते, पण मी तर त्यांना अख्खी रेल्वेच दिली. वंदे भारत रेल्वेचा विस्तार येणाऱ्या काळात नांदेड (Nanded) पर्यंत आपण करणार आहोत.

त्यामुळे स्वच्छ डबे आणि देशातील महत्त्वाकांक्षी वंदे भारत रेल्वे, जालन्यातून मी सुरू केली. मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त गाडीची जी मागणी केली जात होती, तीही वंदे भारतमुळे पूर्ण झाली आहे. याशिवाय वेटिंग जर अधिक वाढली तर त्यानुसार आणखी एखादी रेल्वे सुरू करावी लागली, तर तीही मराठवाड्यातून मुंबईसाठी सुरू करण्याची आपली तयारी आहे.

सध्या जनशताब्दी आणि वंदे भारत या दोन रेल्वे जालन्याहून मुंबईसाठी आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी तेव्हा माझ्यावर टीका केली असली तरी मी विरोधकांची मागणीही पूर्ण करतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोलाही दानवे यांनी लगावला.

(Edited by Amol Sutar)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT