Aaditya Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sena MLA Disqualification Result : शिवसेना आमदार अपात्रता निकालावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Vishal Patil

Shivsena 16 MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. निकाल देताना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्य करत शिंदे गटातील 16 आमदारांना नार्वेकर यांनी पात्र ठरवले आहे. तसेच खरी शिवसेना देखील एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. या निकालावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलत होतेे.

आदित्य ठाकरेंना(Aaditya Thackeray) मीडियाने निकालाबाबत प्रतिक्रिया विचारली असता, आदित्य ठाकरे म्हणाले 'काय निर्णय काय? अपात्र! हे अपेक्षित होतं. इतकी निर्लज्जपणे लोकशाहीची हत्या दुसरी कुठलीही ठरू शकत नाही. जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्त्वाचा आहे. हे देशासाठी हे मोठे संकेत आहेत 2024मध्ये जर अशी गद्दारी, खोक्याचं राजकारण कायदेशीर झालं तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वत:चं लिहायचं आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांच्यावर निशाणा साधत आदित्य ठाकरेंनी, 'एवढी वर्षे जेव्हा राहुल नार्वेकर आमच्यात होते, तेव्हा कोणत्या पक्षप्रमुखांचे आदेश घेत होते. कोणत्या नेतृत्वाच्या तिकीटावर लढत होते, एबी फॉर्म कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवावं. लोकशाहीची भरदिवसा एवढी निर्लज्ज हत्या मी देशाच्या 75 वर्षांच्या इतिहासात कधीच पाहिली नाही. उलट तपासणी या खोके सरकारची आता लोकशाहीमध्ये जनता करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्त अपेक्षा जनतेकडून आहे.' अशी प्रतिक्रिया दिली.

याचबरोबर, 'देशात हिटलरशाही सुरू आहे. आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेला असताना अशा प्रकारचा निर्णय येतो हे धक्कादायक आहे. जगाला आता कळले आहे की आपल्या देशात लोकशाहीला मारलेलं आहे. देशात हिटलरशाही सुरू झालेली आहे. अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विऱोधात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तोफ डागली आहे. बेकायदेशीर विधानसभा अध्यक्षांनी हा बेकायदेशीर निर्णय दिला आहे,असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. हा निकाल आम्ही मान्य करणार नाही. महाराष्ट्राची जनता गद्दारांना क्षमा करणार नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेला वनवासाला पाठवण्याचे पाप एकनाथ शिंदे यांनी केले आहे, असे संताप राऊत यांनी व्यक्त केला.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT