Gopichand Padalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar : शिवसेना मंत्र्यांनंतर फडणवीसांचे निकटवर्तीय पडळकरांचा अजित पवारांवर निधीवरून आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

Ajit Pawar News : संपूर्ण भारतात प्रथमच अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत आहे. त्याचं सर्व श्रेय भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना जातं. अहिल्यादेवींचा इतिहास एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच पुढे आणला जात आहे.

Vijaykumar Dudhale

Pandharpur, 29 May : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ओबीसी, धनगर समाजाच्या योजनांना निधी मिळत नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यासाठी अजित पवार हेच जबाबदार आहेत. अजित पवारच निधी अडवत आहेत, त्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार, मंत्र्यांनंतर आता भाजपचे आमदारही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निधीच्या अडवणुकीवरून आरोप करत आहेत. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही अजित पवार यांच्यावर ओबीसी, धनगर समाजाच्या निधीवरून आरोप केला आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर हे पंढरपुरात आले होते. त्या वेळी त्यांनी निधीबाबत अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून निधीची अडवणूक होत आहे, ही बाब खरी आहे. पण मी आज त्याच्यावर बोलणार नाही. कारण अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा विषय आपला महत्वाचा आहे.

ओबीसी आणि धनगर समाजाच्या योजना याबाबत मी ३१ मेनंतर बोलणार आहे. निधीच्या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे. पण आता माझी भावना अशी झाले आहे की ते पत्र आता आपण ३१ मेनंतर द्यावं. त्यामुळे मी निधीच्या संदर्भातील पत्रही ३१ मेनंतरच मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.

गोपीचंद पडळकर म्हणाले, संपूर्ण भारतात प्रथमच अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत आहे. त्याचं सर्व श्रेय भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना जातं. अहिल्यादेवींचा इतिहास एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच पुढे आणला जात आहे. यापूर्वी हे काम कोणीही केलेले नाही. अहिल्यादेवींच्या विचारावर मोदी हे काम करत असल्याचे दिसून येत आहे. काश्वी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

पूर्वीचे रायसोनी नावाचे गाव म्हणजे आताचे राष्ट्रपती भवन हे होळकरांच्या जागेत आहे. दिल्लीत अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक होणे अपेक्षित आहे. होळकर घराण्याचे मूळ पुरुष मल्हरराव होळकर यांचे स्मारक कुठेच नाही. त्यांचे स्मारक होण्याची आवश्यकत आहे. दिल्लीत अहिल्यादेवींचे स्मारक होण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करणार आहे, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT