Bachchu Kadu Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bachchu Kadu On State : बच्चू कडूंचा 'प्रहारी' इशारा ! म्हणाले, "आम्ही उठलो तर सरकार..."

Sunil Balasaheb Dhumal

Satara News : राज्यात शिंदे-फडणीस-पवार सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार बच्चू कडू हे वारंवार सरकारला इशारा देत आहेत. आता त्यांनी आम्ही म्हणेल तसेच सरकाराला वागावे लागेल, असा दावा करून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला. 'आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्या १० ते ११ आमदार विजय होतील, पण आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसेल. आम्ही उठलो तिथून सरकार उठेल' असा प्रहारी दम आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या शिंदे-फडणवीसांनी ताटकळत ठेवल्याने बच्चूभाऊ वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. (Latest Political News)

राज्यात दीड वर्षानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तत्पुर्वी होणाऱ्या लोकसभेच्या जागावाटपाचे गणित सोडवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच बच्चूभाऊंनी थेट विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. सातारा दौऱ्यावर असताना कडूंनी "आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून १५ जागांची मागणी करणार आहे", असे सांगितले.

महायुतीत एकनाथ शिंदे, अजित पवार व भाजप असताना तुम्हाला इतक्या जागा मिळणार का? या प्रश्नावर बच्चूभाऊ म्हणाले, "याबाबत त्यांनी अभ्यास करावा, ते माझे काम नाही. आमचे १० ते ११ आमदार निवडून येतील. त्यावेळी आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसेल, आम्ही उठलो तर सरकार उठेल", असे बेधडक बोलून त्यांनी वेगळी चूल मांडण्याचीही पुररुच्चार केला.

ठाकरे सरकारमध्ये मंत्रीपदावर (राज्यमंत्री) राहिलेल्या बच्चू कडूंना शिंदे-फडणवीस सरकारनेही मंत्रिपदाचा शब्द दिल्याचे बोलले जात आहे. आपल्या वाट्याला मंत्रीपद येणार असल्याचे बच्चूभाऊंनीही अनेकदा सांगून टाकले होते. पण, सरकारला आता सव्वावर्षे उटल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यांच्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतचे आठजण मंत्री झाले. आताही विस्तार होण्याचे दावे ठोकले जात असले तरी बच्चूभाऊंनी मात्र छातीवर तलवार ठेवली तरी मंत्रिपद घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे आपण नाराज नसल्याचे वारंवार सांगणारे कडू सरकारच्या निर्णयांनी दुःखी झाल्याचे दिसून येतात.

दरम्यान, बच्चूभाऊंनी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण १५ जागांची मागणी केली आहे. या जागांवर प्रहारच्या वतीने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे सांगून त्यातील १०-११ जागा निवडून येणाचाही दावा कडूंनी यापूर्वी केलेला आहे. महायुतीत सन्मापूर्वक जागा मिळाल्या नाही तर स्वतंत्रपणे निवडणुकी लढवणार असल्याचा इशारा कडूंनी यापूर्वीच दिला आहे. यानंतर सातारा येथे त्यांनी थेट आमच्यामुळे सरकारला आम्ही म्हणेल तसेच वागावे लागेल, असा दावा करून एक प्रकारे निर्वाणीचाच इशारा दिल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. यामुळे बच्चू कडूंच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT