Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब थोरात यांनी सांगितले राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे कारण...

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. राज्यात मंत्रीमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी शिंदे गट व भाजपवर टीका केली. ( Balasaheb Thorat explained the reason for non-expansion of the state cabinet )

राज्यात नैसर्गिक संकट असताना मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, त्यांनी आतापर्यंत मंत्रीमंडळ विस्तार करायला हवा होता. मात्र माझ्या मते त्यांचे आपसातील वाद मिटत नाहीत. ते सर्वोच्च न्यायालयाचे कारण देत आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांचे आपसातील वाद मिटत नाहीत, असे मला दिसते आहे. दोघांचेच मंत्रीमंडळ आहे मग मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय तरी लवकर व्हायला हवा होता, अशी कोरपखळीही त्यांनी मारली.

त्यांनी गडचिरोलीत जाऊन पूर परिस्थिती पाहिली. मात्र संपूर्ण महाराष्ट्र सध्या पूराच्या संकटात आहे. सुमारे 90 नागरिकांचे त्यात बळी गेले आहेत. या परिस्थितीचा आढावा दुर्दैवाने नव्या सरकारने घेतलेला दिसत नाही. त्याबाबतीतील जागृकता दिसत नाही. जनता मोठ्या आशेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाहत आहे. मात्र निर्णय तसे होताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या नियमित कर्ज भरण्याचा निर्णय आम्हीच घेतलेला होता, असे त्यांनी सांगितले.

आम्ही खुप चांगले निर्णय घेतले होते. ते थांबविण्याचा अथवा बदलण्याचा प्रयत्न त्यांना चाललेला दिसतो. हे सरकार केवळ आमचे निर्णय घेऊन ते बदलण्याचे काम करत आहेत. आमचे ते चांगले निर्णय बदलले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT