Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालकमंत्र्यांची घोषणा झाल्यानंतर आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी गेले. त्यामुळे पालकमंत्रिपदावरून शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. रायगडमध्ये शिवसेनेचे जास्त आमदार असूनही पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना मिळाले. तर, मंत्री दादा भुसे नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी उत्सुक असताना पालकमंत्रिपद भाजपच्या गिरीश महाजन यांना मिळाले.
एकनाथ शिंदे गावी आल्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्नाचा हा भाग असल्याचे बोलेले जात आहे. मात्र, रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्ट बोलले आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले, 'भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदाची मागणी करत असतील तर यामध्ये चुकीचे काय आहे? अपेक्षा करणे यात वावगे काय आहे? त्यांनी रायगडमध्ये काम केलं आहे. मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून यावर तोडगा काढू.'
नवीन महाबळेश्वर या प्रोजेक्टसाठी मी गावी आलो आहे. मात्र, लोक म्हणतात नाराज झालो म्हणून गावी आलो. पण हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावे लागेल. या भागात फिरावे लागेल, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या नाराजीच्या चर्चांवर भूमिका मांडली. तसेच या प्रोजेक्टमध्ये 235 गावे आहेत. त्यामध्ये आणखी 295 गावांनी येण्याची भूमिका मांडली आहे. पर्यटन जिल्हा अशी ओळख निर्माण होईल, यासाठी जे कष्ट घ्यावे लागतील ते कष्ट भूमीपूत्र म्हणून मला घ्यावे लागतील, असे देखील शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.