Satej Patil Backs Harshawardhan Sapkal’s Leadership Qualities Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil News : हर्षवर्धन सपकाळ हेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष का? सतेज पाटलांनी सांगितलं खरं कारण

Harshwardhan Sapkal Named Maharashtra PCC President : आमदार सतेज पाटील यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला, याबाबतही आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.

Rahul Gadkar

लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र महायुतीपुढे काँग्रेसला अपयश आले. महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याने त्याचा फटका आघाडीतील इतर पक्षांना देखील बसला. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव नेमका कोणत्या गोष्टीमुळे झाला, हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद का आले, याबाबत पक्षाचे नेते आमदार सतेज पाटील यांनी आपली भूमिका ‘सरकारनामा’शी बोलताना मांडली.

काँग्रेसला महाराष्ट्रात यश का मिळत नाही? पक्ष सोडणारे राहुल गांधींवर खापर फोडतात? या प्रश्नावर सतेज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, काँग्रेस सत्तेत असल्याने पक्षामधील नेत्यांची व्यक्तिगत ताकद निर्माण झाली. पक्षाची ताकद निर्माण व्हायला अडचण झाली. व्यक्ती गेला की पक्षाची ताकद गेली. असे महाराष्ट्रातील अनेक तालुक्यातील चित्र आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या विचारांचा कार्यकर्ता राहिला पाहिजे, असं राहुल गांधींचं मत आहे. हळूहळू ही पोकळी भरून निघेल.

अनेकांनी परिस्थिती पाहून काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचे नुकसान पक्षाला झाले. लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका काँग्रेसला बसला नाही. नेता गेला म्हणून मतदार गेला नाही, असे चित्र लोकसभेत पाहायला मिळाले. सत्यजित तांबे यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेले वक्तव्ये चुकीची आहे. गांधी यांच्यामुळेच माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्या. ज्यावेळी भूमिका घ्यायची त्यावेळी ते खंबीरपणे आमच्या मागे उभे राहतात. सत्तेची पदे भोगल्यानंतर राहुल गांधीं बद्दल बोलणे योग्य नाही, असे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

सध्या हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रदेशाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. तुमचे नाव आघाडीवर होते, तुम्हाला संधी का नाही दिली? यावर बोलताना सतेज पाटील यांनी काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची योग्य निवड करण्यात आली. संघटनात्मक बांधणीसाठी पूर्ण वेळ देण्यासाठी सपकाळ यांच्याकडे काँग्रेसने पाहिल्याचे सपकाळ म्हणाले.

काँग्रेस विचारधारा असलेली व्यक्ती आहे. आजच्या ब्रेकिंगच्या जमान्यात सपकाळ गरज नसलेले बोलणे टाळून, पक्षाच्या हिताचे आणि मुद्द्याचे बोलणे आणि सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम काँग्रेसने केलेले आहे. नेतृत्वाने घेतलेला निर्णय काँग्रेसमध्ये शिस्त म्हणून पाळला जातो, असे पाटील यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT