Gram Panchayat Result :
Gram Panchayat Result :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगरमध्ये दिग्गज नेत्यांनी राखले गड : थोरातांना गावात धक्का ; विखे, गडाखांची चमकदार कामगिरी!

सरकारनामा ब्यूरो

Gram Panchayat Result : अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील एकूण 203 ग्रामपंचायतच्या निवडणुकांचे निकाल आता समोर येत आहेत. जिल्ह्यातील 203 यापैकी 13 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर उर्वरित 190 ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडते आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. याठिकाणी आजी माजी महसूलमंत्र्यांचे गट आमने सामने लढत होते. संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींपैकी आत्तापर्यंत थोरात गटाने 25 ठिकाणी आपली सत्ता कायम राखलीये. तर थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखेंनी थोरातांच्या सत्तेला सुरूंग लावत आठ ग्रामपंचायतवर आपला झेंडा रोवला आहे. बाळासाहेब थोरात यांचे मूळगाव असलेल्या जोर्वे गावची सत्ताही विखे पाटील गटाने खेचून नेल्याने गड आला पण सिंह गेला अशी थोरात गटाची अवस्था झाली आहे.

संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतवर विखे पाटील समर्थक असलेल्या इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई सरपंच झाल्या आहेत. राहाता तालुक्याचा आपला गड विखेंनी राखला असून सर्वच्या सर्व 12 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. ठाकरे गटात असलेले माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आपली ताकद दाखवून देत नेवासा तालुक्यातील सर्वच्या सर्व 13 ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अजूनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतमोजणी सुरू असून दिग्गज नेत्यांची प्रतीष्ठा पणाला लागलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT