Jaykumar Gore-Atul Save Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore : जयकुमार गोरे हे सर्वांत चतूर मंत्री; ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी काढला चिमटा

Atul Save statement : अरणच्या भक्तनिवासासाठी पैशाची काळजी करू नये, आम्ही दोघं मंत्री आहोत. पाहिजे तेवढा निधी आणू, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही पोहरादेवीचा उल्लेख केला. पण, पोहरादेवीपेक्षा जास्त लागला तरी निधी आणू.

Vijaykumar Dudhale

Solapur, 25 April : माढा तालुक्यातील तीर्थक्षेत्र अरण येथे चंदन उटी सोहळ्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि ओबीसी विकास मंत्री अतुल सावे हे एकत्र आले होते. या वेळी सावे यांनी अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी पाहिजे तेवढा निधी आणू, काळजी करू नये, असा शब्द देताना जयकुमार गोरे हे सर्वांत चतूर मंत्री आहेत, असा चिमटाही सावे यांनी गोरेंना घेतला.

चंदन उटी सोहळ्यानंतर सावे हे सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याबाबत सभेत भाष्य केले. ते म्हणाले, अरणला भक्तनिवास बांधण्याचा संकल्प प्रभू महाराज आणि सावता महाराज वसेकर यांनी केला आहे. त्या भक्तनिवासाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मलाही आमंत्रण दिले होते.

अतुल सावे (Atul Save) म्हणाले, त्या कार्यक्रमात मी माझ्या भाषणात अरणचा विकास करण्याबाबत फडणवीसांकडे मागणी केली होती. समारोपाच्या भाषणात फडणवीस यांनी अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी शंभर कोटी आणि अरण तीर्थक्षेत्राला अ वर्ग दर्जा देतो, असे जाहीर केले होते. आपलं नशीब एवंढ चांगलं आहे की, जयकुमार गोरे हेच सोलापूरचे पालकमंत्री बनले आहेत. त्या आराखड्यासाठी गोरे आता पाठपुरावा करत आहेत.

अरणच्या भक्तनिवासासाठी पैशाची काळजी करू नये, आम्ही दोघं मंत्री आहोत. पाहिजे तेवढा निधी आणू, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही पोहरादेवीचा उल्लेख केला. पण, तुम्ही काळजी करू नका. पोहरादेवीपेक्षा जास्त लागला तरी निधी आणू, पैशाची कोठेही कमी पडणार नाही, असेही अतुल सावे यांनी जाहीर केले आहे.

सावे म्हणाले, जयकुमार गोरे यांच्या पाठीशी मीही खंबीरपणे उभा आहे. गोरेसाहेबत सर्वांत चतूर मंत्री आहेत. नायगावचा जो प्रस्ताव आहे, तो गोरे यांनी पाठपुराव करून अवघ्य तीन महिन्यांत १४५ कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. त्यामुळे नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांचे चांगलं स्मारक होणार आहे. मुलींच्या शिक्षणासाठी चांगली सोय होणार आहे.

भिडेवाडा, फुले यांचे घर आहे, त्याचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने शंभर कोटींचा निधी दिला आहे. भिडे वाड्यासंदर्भात होणाऱ्या बैठकीला आम्ही जयकुमार गोरे यांनाही निमंत्रित करू. सर्वांनी प्रयत्न केले तर भिडे वाड्याचे एक चांगले स्मारक तयार होईल. मी आणि जयकुमार गोरे अरण, नायगाव आणि भिडेवाड्याचा विकास करण्यासाठी कटीबद्ध आहोत, असेही अतुल सावे यांंनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT