Prithviraj Chavan, Chhagan Bhujbal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan Vs Chhagan Bhujbal : काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचा छगन भुजबळांना टोला; म्हणाले,'आरक्षणाचे प्रश्न...'

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad News : शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे काय बोलणे झाले, याची माहिती मला नाही. मात्र, महाराष्ट्रात जो जातीय संघर्ष निर्माण होत आहे तो थांबवायचा प्रयत्न झाला पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न रस्त्यावर उतरुन सुटत नाहीत. भुजबळ शासनात असतील, शासनाच्या बाहेर असतील त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे, ही महाराष्ट्राची प्रकृती नाही अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मंत्री छगन भुजबळ यांना सुनावले.

कऱ्हाडला ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पुतळा अनावरण आणि कोयना बॅंकेच्या इमारत उदघाटनानंतर माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. कॉग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षासंदर्भातील आश्वासन दिले आहे, त्यातुन तो प्रश्न सुटेल असा विश्वास ठेवला पाहिजे. मुख्यमंत्री काय तोडगा काढत आहेत ते समजल्यावर त्यावर भाष्य करता येईल. जातीय सलोखा राखण्याचे काम सरकारचे आहे, त्याला सर्वांचा पाठिंबा असेल. मात्र, अशाप्रकारचे प्रश्न रस्त्यावर उतरुन सुटत नाहीत. भुजबळ शासनात असतील, शासनाच्या बाहेर असतील त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे ही महाराष्ट्राची प्रकृती नाही असेही ते म्हणाले.

शरद पवार (Sharad Pawar) आणि छगन भुजबळ यांचे काय बोलणे झाले, याची माहिती मला नाही. मात्र महाराष्ट्रात जो जातीय संघर्ष निर्माण होत आहे तो थांबवायचा प्रयत्न झाला पाहिजे. छगन भुजबळ काय करत आहेत हे राज्याने पाहिले आहे. आता शांतता झाली पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरुन तो प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. ते काय करत आहेत त्यावर पुढील दिशा ठरेल असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

'हंडोरेंच्यावेळीच कारवाई व्हायला हवी होती...'

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काय घडले त्याची काँग्रेसकडून चौकशी करुन बाळासाहेब थोरात यांच्याकडून पक्षश्रेष्ठींना दिला आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असेल असे सांगून आमदार चव्हाण म्हणाले, कोणावरही काहीही आरोप करु नये. ज्यांचे नाव घेतले जाते त्यांच्यावर कारवाई झाली तर सांगावे. जो दणदणीत विजय झाला असे सांगितले जाते ते बरोबर नाही असा दावाही चव्हाण यांनी केला.

आम्ही दोन उमेदवार उभे केले असते तर बिनविरोध निवडणूक झाली असती. मात्र, आम्ही मुद्दाम तीन उमेदवार उभे करुन तीन घटकांना न्याय दिला. आमची काही मते फुटली. जयंत पाटील यांनाही अपेक्षीत असलेली मते मिळाली नाहीत. काही मतांवर आमचा विश्वास होता. मात्र ते आले नाहीत. त्यांचा अहवाल श्रेष्ठींकडे पाठवला आहे. चंद्रकांत हंडोरेंच्यावेळीही असे झाले होते. त्यावेळी कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT