Rahul Gandhi  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rahul Gandhi News: मोठी बातमी! राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा तडकाफडकी रद्द, 'हे' कारण आलं समोर

Deepak Kulkarni

Kolhapur News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सांगली त्यानंतर कोल्हापुरात 4 ऑक्टोबरला हजेरी लावणार होते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठं बळ मिळणार होतं. पण आता दौर्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

तब्बल 14 वर्षांनंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) हे कोल्हापूर दौऱ्यावर येत होते.त्यांनी गेल्या महिन्याभरात पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची मशागत सुरू केली होती.पण अखेर राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौकातील बहुशास्त्राधारित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते आनावरण होणार होते. मात्र, त्यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. आता राहुल गांधी हे उद्या (ता.5) सकाळी साडेआठ वाजता कोल्हापुरात येणार असल्याची माहिती आहे.

विविध कार्यक्रमानिमित्त काँग्रेसने राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. सायंकाळी साडेपाच वाजता कोल्हापूर विमानतळ येते त्यांची आगमन होणार होते. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विजय वडेट्टीवार हे कोल्हापूर विमानतळ येथे गांधी यांच्या स्वागतासाठी झाले होते.

मात्र, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळताच पटोले आणि वडेट्टीवार हे कोल्हापूर विमानतळावरून निघून गेले.दरम्यान स्वागतासाठी आलेले पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यकर्ते नाराज होऊन माघारी परतले आहेत.

दरम्यान, कसबा बावडा येथील भगव्या चौकातील होणारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील पुढे ढकलण्यात आले आहे. आजचा अनावरण सोहळा रद्द करण्यात आला असून उद्या शनिवारी सकाळी दहा वाजता राहुल गांधी यांच्या हस्ते या पुतळ्याच्या अनावरण होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे

कडेगाव येथे दिवंगत पतंगराव कदम यांच्या 5 सप्टेंबर रोजी झालेल्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी राहुल गांधी यांचा दौरा महत्वपूर्ण ठरला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधी यांचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला दौरा महत्वपूर्ण मानला गेला. त्याला महिना उलटला नसताना राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा काँग्रेस जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT