Satara Political News : सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, किसन वीर आणि वसंतदादा पाटील यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी आयुष्यभर गांधी, नेहरू यांचा विचार जोपासला. संसदेत असताना सामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हितास प्राधान्य दिले. मात्र आज त्यांच्या विचाराला बदनाम करण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनुयायी करीत आहेत, अशी टीका खासदार शरद पवार यांनी केली.
सातारा Satara लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता.29 ) वाईत सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडेतोड टीका करताना शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागील दहा वर्षांच्या काळात देशात प्रचंड महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे.
शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महिलांवरील अत्याचाराचे परिसीमा ओलांडली आहे. आता देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यासाठी या निवडणुकीत यशवंत विचारांचे पाईक असलेल्या स्व.लक्ष्मणराव पाटील, मदनराव पिसाळ यांसारख्या नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असल्याचेही पवारांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शशिकांत शिंदे Shashikant Shinde म्हणाले, वाई मतदारसंघ लक्ष्मणराव पाटील, मदनराव पिसाळ, बाळासाहेब भिलारे यांनी स्थापनेपासून निष्ठावंतांचा म्हणून जपला. आजच्या सभेला उसळलेला जनसागर पाहून वाई विधानसभा मतदारसंघच विजयाचा शिल्पकार असेल, याची खात्री झाली. विरोधकांनी सुडाचे राजकारण सुरू केले असून त्याविषयी निष्ठावंतांमध्ये मोठ्या प्रमाणात सुप्त उद्रेक आहे. त्याचा स्फोट या निवडणुकीत होऊन महायुतीला निश्चित तडाखा बसेल.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.