MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जिहे कठापूरचे टेंडर रखडविण्याचे पाप लोधवडेकरांचे.... जयकुमार गोरेंचा आरोप

विशाल गुंजवटे

बिजवडी : देवेंद्र फडणवीस यांनी माणच्या उत्तर भागातील ३२ गावांना जिहे कठापूर योजनेचे पाणी आंधळी धरणातून उचलून देण्याच्या वाढीव योजनेला २०१९ मध्येच मंजूरी देवून निधी जाहीर केला होता. त्यानंतर दुर्दैवाने आलेल्या अपशकुनी महाविकास आघाडीने आणि लोधवड्याच्या नतद्रष्ट प्रवृतींनी या योजनेचे टेंडर जाणूनबुजून रखडविण्याचे पाप केले, असा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे.

मार्डी गटातील भाजपच्या संवाद यात्रेदरम्यान आमदार गोरे बोलत होते. ते म्हणाले, मी आमदार झाल्यापासून अथक प्रयत्न करुन सर्वच पाणी योजनांना निधी मिळवून योजना पूर्णत्वाकडे आणल्या आहेत. उरमोडीचे पाणी लागेल तेव्हा येत आहे. आता टेंभू, जिहे कठापूरचे येत आहे. आपल्या भागात पाणी आल्याने शेती सुधारणार आहे.

युवकांच्या हाताला काम मिळत आहे. उद्योगधंदे वाढत आहेत. भाजपाचे केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून काम करत आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस आपल्यासाठी लागेल त्या कामांसाठी लागेल तितका निधी देत आहेत. केंद्राच्या योजनांचे आपण सर्वजण लाभार्थी आहोत. यापुढेही आपल्याला आपल्या भागाच्या विकासाची गती अशीच वेगवान ठेवायची आहे. त्यासाठी भाजपाच्या पाठीशी ताकद उभी करा असे आवाहनही त्यांनी केले.

म्हसवड येथील एमआयडीसी माझ्या प्रयत्नाने मोदी आणि फडणवीस यांनी मंजूर केली आहे. ही एमआयडीसी दुसरीकडे नेण्याची कुणाच्यात धमक नाही. उगाच काहींनी आंदोलनाची नौटंकी सुरु केली आहे. जेव्हा राष्ट्रवादीने दोन वर्षे इथल्या मंजूर पाणीयोजनेचे टेंडर काढले नव्हते तेव्हा कुणी आंदोलन केले नाही. आता एमआयडीसीसाठी कुणी फुसकी, राजकीय आणि राष्ट्रवादीने सांगितलेय, म्हणून आंदोलने करु नयेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT