Rahul Gandhi News : संविधानाच्या रक्षणासाठी उतरलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या करण्यात आली. ही हत्या पोलिसांनी केली आहे.पोलिसांना मेसेज देण्यासाठी मुख्यमंत्री विधानसभेत खोटे बोलले, असा आरोप राहुल गांधींनी राहुल गांधींनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
सोमनाथच्या हत्येला विचारधारा जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिले आहे त्यामुळे ते देखील जबाबदार आहेत. त्यामुळे दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, असे देखील राहुल गांधी म्हणाले.
सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला मी भेटलो. ज्यांना मारहाण झाली त्यांना भेटलो. मला पोस्टमार्टमचे रिपोट दाखवले, व्हिडिओ दाखवले, मारहाणीचे फोटो दाखवले, 99 टक्के नाही तर 100 टक्के पोलिस कस्टडीतील ही हत्या आहे. पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे. असे देखील राहुल गांधी यांनी सांगितले.
दलित असल्याने आणि संविधान रक्षण करत होता म्हणून त्याची (सोमनाथ सूर्यवंशी) हत्या केली. आरएसएसची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची विचारधार आहे. आम्हाला वाटते या सोमनाथच्या हत्येप्रकरणात न्याय मिळाला पाहिजे. ज्यांनी हे केले आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे राहुल गांधींनी ठणकावले
पत्रकारांनी राहुल गांधी यांना विचारले की या प्रकरणी कारवाई करण्यात आली त्यावर तुम्ही संतुष्ट आहात का? यामध्ये राजकारण केले जात आहे का? त्यावर ते म्हणाले, मी कारवाईने संतुष्ट नाही. या लोकांनी मर्डर केला आहे. यात कोणतेही राजकारण नाही. ही हत्या आहे. हे न्यायाचे प्रकरण आहे. पिडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.