Mumbai News : महायुतीचे सरकार आल्यानंतर महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये मोठी चुरस पाहावयास मिळाली. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, पालकमंत्रीपद, बंगले वाटपावरून तीन ही पक्षात चुरस होती. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून नाराजीनाट्य पहावयास मिळत होते. चारच दिवसापूर्वी नाशिकचा तिढा सुटला अन पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले. तर दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी फॉर्म्युयला ठरला असून त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्र्याची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाराजी दिसत होती. रायगडचं पालकमंत्रिपद हे महायुतीमध्ये (Mahayuti) राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आले होते. तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, या दोन्ही ठिकाणी पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेचे नेते इच्छूक होते. नाशिकसाठी दादा भुसे तर रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले हे इच्छूक होते. मात्र, पालकमंत्रिपद न मिळाल्याने भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली.
येत्या काळात रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा कालावधी ठरण्याची शक्यता आहे. पाहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी कॉँग्रेसला (NCP) तर दुसऱ्या अडीच वर्षांची टर्म शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे. पहिले अडीच वर्षे अदिती तटकरे याच रायगडच्या पालकमंत्रीपदी राहण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या अडीच वर्षांत पालकमंत्रिपद हे भरत गोगावले यांना मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती आता समोर येत आहे.
भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद मिळावे अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील इच्छा होती. मात्र त्यांना पालकमंत्रिपद मिळाले नाही, त्यांच्याऐवजी आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळालं तर नाशिकचं पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांना मिळाले यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर महायुती सरकारने रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली, अखेर आता हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा काळ ठरण्याची शक्यता आहे. पाहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी तर दुसऱ्या अडीच वर्षांची टर्म शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे. पहिले अडीच वर्षे अदिती तटकरे याच रायगडच्या पालकमंत्रीपदी राहण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या अडीच वर्षांत पालकमंत्रिपद हे भरत गोगावले यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचे या निवडीकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.