Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या दोन महिन्यात पाहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीवर मत व्यक्त केले आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी यावेळी विधानसभा निवडणुकांबद्दल मांडलेल्या भूमिकेवरुन आता त्यांच्यावर टीका केली जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या विधानानंतर पलटवार करीत नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही केला. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेनंतर अजितदादांच्या लाडक्या आमदाराने ठाकरेंवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी गुरुवारी मनसेचा पदाधिकारी मेळावा घेतला. या मेळाव्यातून राज ठाकरेंनी प्रथमच निवडणुकांच्या निकालावर संशय व्यक्त केला. शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आले. त्यांचे 10 आमदार येतात. आणि लोकसभेला अजित पवार यांचा एक खासदार आला. त्यांचे 41 आमदार येतात. चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात? काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे.
अमोल मिटकरींनी ठाकरेंना दिला सल्ला
या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही, असा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली. त्यानंतर या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंनी अजित पवारांसारखं पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागले पाहिजे, असा सल्ला अमोल मिटकरींनी ठाकरेंना दिला आहे.
“राज ठाकरेंना नेहमीच उशिरा उठून चिंतन करण्याची सवय आहे. त्यामुळे विधानसभेला स्वत:च्या घरात झालेल्या दारुण पराभवानंतर दीड महिन्यांनी ४२ जागा कशा आल्या हा शॉक त्यांना दीड महिन्यांनी बसला आहे. मात्र, आपल्या सुपुत्राचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत, यावर त्यांनी भाष्य करावं. यासाठी त्यांनी पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागले पाहिजे”, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुकीचा निकाल लागल्यावर बरेच जण भेटले. ज्या दिवशी निकाल लागला. महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता. मात्र लोकांमध्येच संभ्रम होता. असा कसा निकाल लागला. भाजपला 132 जागा मिळाल्या. त्याआधी 106 होत्या. त्या आधी 122 जागा होत्या. ठिक आहे, समजू शकतो. अजित पवार 42 जागा. चार पाच जागा येतील की नाही असे वाटत असताना अजित पवार यांना 42 जागा मिळतात. कुणाचा तरी विश्वास बसेल का. जे इतकी वर्ष राज्यात राजकारण करत आले. अजित पवार, भुजबळ ज्यांच्या जिवावर मोठे झाले त्या शरद पवार यांना 10 जागा मिळतात. हे न समजण्याच्या पलिकडची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
चार महिन्यातच पडला फरक
चार महिन्यापूर्वी राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त खासदार काँग्रेसचे आले. 13 खासदार आले. एका खासदाराखाली पाच ते सहा आमदार येतात. किती आमदार काँग्रेसचे यायला हवे होते. सहा ते सहा नाही पकडलं. तीन किंवा चार पकडले. त्यांचे 15 आमदार येतात. शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आले. त्यांचे 10 आमदार येतात. आणि लोकसभेला अजित पवार यांचा एक खासदार आला. त्यांचे 41 आमदार येतात. चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात? असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.