Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde  sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena MLA Disqualification Result : एकनाथ शिंदेंचा मोठा विजय; गोगावलेच शिवसेनेचे मुख्य प्रतोद, नार्वेकर नेमकं काय म्हणाले?

Deepak Kulkarni

Shiv Sena MLAs Disqualification Verdict: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बहुचर्चित महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केला. या निकालात त्यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेनाच खरी असल्याचा निकाल दिला. यावेळी त्यांनी शिवसेनेची प्रमुख प्रतोद म्हणून सुनील प्रभूंची निवड चुकीची ठरवली. शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची नियुक्ती योग्य असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी यांनी दिला. यावेळी त्यांनी गोगावलेंचाच व्हीप योग्य असल्यावरही शिक्कामोर्तब केले.

महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकालाचे वाचन बुधवारी (ता.10)केले. य़ा निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. या निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) या निकालात शिवसेनेची 1999 सालची घटना वैध असून 2018 साली ठाकरेंनी केलेली घटना दुरूस्ती आणि प्रतिज्ञापत्रही अमान्य असल्याचे विधानही त्यांनी केलं आहे.

नार्वेकर म्हणाले,शिवसेनेत दोन गट पडले त्यावेळी शिंदे गटाकडे 37 आमदार होते. त्यामुळे त्यांचा गट खरी शिवसेना आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाचीच असल्याने त्यांचे आमदार अपात्र ठरवता येणार नाहीत.तसेच सुनिल प्रभू यांना बैठक घेण्याचा अधिकार नाही.त्यामुळे 16 आमदार अपात्र करण्याची याचिका फेटाळली.भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा व्हीप वैध असल्याचेही नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता विधानसबा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला आहे. यात त्यांनी एकनाथ शिंदे यांचा पक्षच हा मूळ शिवसेना आहे. शिंदे यांच्या पक्षाकडे बहुमत आहे, असा निकाल दिला. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे.विधानसभा अध्यक्षांनी आजच्या निकालातून ठाकरे गटाला अनेक धक्क्यावर धक्के दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नार्वेकर म्हणाले, प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या 1999 सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल.कारण 2018 मध्ये पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत.त्यामुळे सुधारित पदांची रचना ग्राह्य धरले जाणार नाही.2018 सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी होती. पण या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. त्यामुळे ती स्वीकारता येणार नाही असं नार्वेकर निकालात स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT