Mumbai News : राज्यभरातील शेतकरी वर्गाचे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे शेतात उभे असलेले पीक वाहून गेले आहे. त्यामुळे बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या मदतीवर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांना वेळेवर मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यातील महायुती सरकरने येत्या काळात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, असे साकडे माजी मंत्री व शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.
राज्य सरकारने येत्या काळात जर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवले तर त्यामध्ये राज्य सरकारला मदतीबाबत ठोस निर्णय घेता येणार आहे. तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवले तर सर्वच विषयावर चर्चा करता येणार आहे. या पावसानंतर आलेल्या पुरामुळे शेतकरी वर्गाच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अधिवेशन घेण्याची मागणी केली जात असल्याचे जयंत पाटील (jayant Patil) यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने येत्या काळात तीन दिवसीय विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी तसेच सरकारच्या दिरंगाईवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले.
राज्यातील शेतकरी संकटात आहेत आणि त्यांना ठोस मदतीची गरज आहे. केवळ पाहणी आणि घोषणा न करता, सरकारने सभागृहात चर्चा करून मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. जयंत पाटील यांच्या या मागणीमुळे आता अधिवेशनावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी पक्ष या मागणीवर काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलीली मदत तुटपुंजी असल्याने नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. त्यानंतर मदतीचे निकष ठरवण्याबाबत पंचनामा होण्याची वाट पाहावी लागणार असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.