Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने राज्यातील वातावरण तापले असून राज्यात सर्वत्र याची धग पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून केला जात असतानाच सोमवारी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. आमदार धस यांची ही भेट चर्चेत आली आहे. आमदार धस यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा केली याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचवेळी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून धस यांनी मोठी मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारी घटना पाहता कायदा सुव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे. ही परिस्थिती येत्या काळात सुधारण्याची गरज आहे. त्यामुळे येत्या काळात बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्याकडे विशेष बाब म्हणून देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
बीड जिल्ह्यात केमिकल ताडी विकली जात आहे. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यासोबतच हातभट्टी, दोन नंबर धंदे बंद करण्याची गरज आहे. माझ्या आष्टी मतदारसंघातील हे सर्व धंदे बंद केले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील हे सर्व धंदे बंद करण्यासाठी मी आर्जव करतो, माझी आर्त किंकाळी ऐकून त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद फडणवीस यांनी स्वीकारावे, अशी मागणी धस यांनी केली.
मी पाच टर्म आमदार राहिलो आहे. त्यामुळे मला बऱ्याच गोष्टीची कल्पना आहे. मुख्यमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे काही काळ होते. त्यामुळे विशेष बाब म्हणून त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारावे, अशी आर्जव करीत असल्याचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.