Thane News : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात येतो आहे. त्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना ठाणे शहरात चप्पा चप्पा फक्त भाजपा असे बॅनर लावले होते. आता दिवा शहरांत भाजपने “आता वेळ आली आहे ह्या कार्यसम्राटांना फाटकी शॉल व नासलेले श्रीफळ देवून घरी बसविण्याची” अशा आशयाचे बॅनर लावत अप्रत्यक्ष रित्या एकनाथ शिदेंच्या शिवसेनेला डिवचले आहे.
दिव्यात भाजपने आता निवडणूक तयारी केली असून आपल्या रडावर शिंदेच्या शिवसेना अप्रत्यक्ष रित्या शिवसेना शिंदे गटाला टार्गेट करायचे ठरवल्याची चर्चा आहे. त्यानुसार ऐन दिवाळीत 4 वर्षापूर्वी जी गोष्ट घडली होती, त्याची आठवण दिवेकरांना करून देत, त्याचे बॅनर भाजपने लावले आहेत.
दिव्यात ४ वर्षापूर्वी ऐन दिवाळीत विकासाच्या नावाखाली सामान्य दिवेकरांच्या इमारती पाडून त्यांना बेघर करत पडले गाव येथे स्थलांतरीत करण्यात आले. मात्र त्यांच्या समास्या जैसे थे आहेत.त्यामुळे भाजपने "आली दिवाळी पण, आठवणीत आहे… दिवेकरांना चार वर्षापूर्वीची काळी दिवाळी” असा आशयाचे बॅनर लावले आहेत, याचं बॅनरवर विकासाचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.दिवाळीच्या तोंडावर विकासकांनी नागरिकांची घरे तोडली.त्यांना बेघर केले आणि ५० रुपयांच्या हप्त्यांसाठी फेरीवाले बसविले,एका संस्थेने तिथे सार्वजनिक शौचालय उभारले..हाच का तो कार्यसम्राटांचा विकास? असे काम करुन दिव्याचा विकास होणार आहे का? ही घरे फेरीवाले बसविण्यासाठी तोडली होती का? असा प्रश्नही या बॅनरमधून विचारण्यात आला असून अप्रत्यक्ष रित्या शिवसेनेला डिवचलं आहे.
पुढे आवाहन करताना म्हटले आहे की, “आता वेळ आली आहे ह्या कार्यसम्राटांना फाटकी शाॅल व नासलेले श्रीफळ देवून घरी बसविण्याची”, “मतदान बदला दिवा नक्कीच बदलेल”, असे आवाहन करत अप्रत्यक्ष शिवसेनेच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आता बस्स झाले, ज्यांच्यावर तुम्ही कार्यसम्राट म्हणून विश्वास ठेवला त्यांनी तुम्हाला बेघर केले आहे.स्थलांतरीत केले आहे, त्यांच्यामुळे तुमच्यावर आज काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आहे. त्यामुळे एकदा मतदान बदलून पहा तरच तुमचे चांगले दिवस येणार आहेत, असा संदेश या बॅनरमधून दिवेकरांना देण्यात आला..
भाजप दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी सांगितले की आज ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत याच ठिकाणी चार वर्षापूर्वी काही लोकांची घरे होती. ऐन दिवाळीच्या तोंडावर घरात फराळ बनत असताना त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवला गेला, त्यांना बेघर केले गेले. विकासाच्या नावाखाली त्यांना बेघर केले आहे. चार वर्षानंतर इथे परिस्थिती पहाल तर जशी घर तोडली तशीच जमिन येथे आहे. येथील स्वयंघोषित कार्यसम्राट आहेत त्यांनी विकासाच्या नावावर घरं उध्वस्त केली. अशा लोकांनी या रस्त्यावर फेरिवाले बसवलेले आहेत आणि काही लोक त्यांच्याकडून ५० रुपये हप्ता गोळा करतात. आपले येथील जे सांसद आहेत त्यांचे रत्न खोटे आहेत हे आम्हाला दिवेकरांना सांगायचे आहे. त्यांच्या रत्नांमध्ये मिलावट आहे. ते बनावट आहेत. विकासाच्या नावाखाली लोकांना त्यांनी बेघर केले आहे, हे दिवेकर कधी विसरणार नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.