Uddhav Thackeray Vs  Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Thackeray Vs Shinde : ''दाढीवरून हात फिरवणं हा सुद्धा नपुंसकपणा; आता..'' ; ठाकरे गटाचा शिंदेंना खोचक टोला

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : काही हिंदुत्वादी संघटनांच्या नेत्यांनी भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक वाद वाढत आहेत, पण राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार त्यावर काहीच कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयानं याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकारला कठोर शब्दांत फटकारलं आहे. तसेच हे सरकार नपुंसक आहे, ते काहीच करत नाही म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत असा तीव्र संताप व्यक्त केला आहे.

याचाच संदर्भ घेत विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. आता शिवसेना( उध्दव ठाकरे गट) चं मुखपत्र असलेल्या सामनातूनही शिंदे फडणवीस सरकारला खोचक टोला लगावला आहे.

ठाकरे गटानं सामना च्या अग्रलेखातून राज्य सरकारवर निशाणा साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदें(Eknath Shinde )नाही डिवचलं आहे. दाढीवरून हात फिरवणे हा सुद्धा नपुंसकपणा आहे. आता नपुंसक शेऱ्यावरही हक्कभंग आणणार काय? असा सवाल सामनाच्या अग्रलेखाद्वारे उपस्थित केला आहे.

'सामना'च्या अग्रलेखात काय म्हटलंय?

जगभरात धर्मांधतेमुळे अनेक देश तुटले. भारताचीही फाळणी झाली. आता नवा घाव भारताला परवडणारा नाही. त्यामुळे धर्माचे राजकारण करणं, त्यातून सत्ता मिळवणं आणि त्यासाठी लोकांचा बळी देणं ही नामर्दानगी आहे अशी टीका करण्यात आली आहे.

तसेच मंत्रालयासमोर तिघांनी जीव देण्याचा प्रयत्न केला. शीतल गाडेकरचा मृत्यू झाला. या घटनांकडे थंडपणे पाहत दाढीवर हात फिरवणे हा सुद्धा नपुंसकपणाच आहे असंही ठाकरे गटानं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

'' कोणतेही ज्ञान खोक्यातून मिळत नाही. ते...''

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डीलिट पदवी देण्यावरूनही ठाकरेंनी टोला लगावला आहे. आता ते आयतेच डॉक्टर झाले आहेत. त्यामुळे जगाचे ज्ञान त्यांनी घेतले पाहिजे. कोणतेही ज्ञान खोक्यातून मिळत नाही. ते अनुभवातूनच मिळते. धर्मांध विचाराच्या कचऱ्यातून तर अजिबातच नाही असंही म्हणाले आहेत.

राज्यात सत्ता मिळावी म्हणून....

राज्यात सत्ता मिळावी म्हणून कामाख्या देवीच्या मंदिरात रेड्यांचे बळी दिले जातात. हे काही पुरोगामी महाराष्ट्राचे लक्षण नाही. धर्म ही अफूची गोळी आहे. ती बंदुकीच्या गोळीपेक्षाही घातक अग्रलेखातून म्हटलं आहे.

न्यायालयाच्या ताशेऱ्यावर फडणवीस काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या टिपण्णीवर भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले, राज्य सरकारविरुद्ध कोणतेही निरीक्षण नोंदवलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारला नपुंसक म्हटले असा कांगावा जे लोक करताहेत त्यांचे वक्तव्य न्यायालयीन कामकाजाच्या ज्ञानअभावातून येत आहे.

याचवेळी न्यायालयाने एक सामान्य विधान केले आहे. सर्व राज्य सरकारांनी काय केले पाहिजे, असे न्यायालय बोलले आहे. मात्र, काही नेते याबद्दल भ्रम पसरवत आहेत. त्यांना न्यायालयीन कारवाई फारशी समजत नाही असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT