Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. त्या मुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे. शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत. त्यामुळे शिंदे यांची पुरती कोंडी झाली असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. 'सामना'तून राऊत यांनी टीका करताच त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे सेनेचे २० आमदार कुठेही सोडून जाऊ नयेत म्हणून एकनाथ शिंदेंना टार्गेट केले जातेय, अशी टीका एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने केली आहे.
राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे 20 आमदार कुठे जाऊ नयेत म्हणून एकनाथ शिंदेंना टार्गेट केले जातेय. कुठल्याच आमदारांचे फोन टॅप केले जात नाहीत, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
'सामना'तून केवळ व्यक्तिगत आकसातून एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्यावर टीका केली जात आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्यावर 'सामाना'तून सातत्याने टीका केली जात आहे. राज्यातील महायुती सरकरचा कारभार सुरळीत सुरु असून त्याची कोणीही चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी 2019 साली महाविकास आघाडीसोबत जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या आमदारांना राजीनामा देण्यास सांगायला हवे होते. मात्र, तसे न करताच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केले. त्यामुळे याबाबत इतरांवर टीका करू नये, असेही सेना नेते रामदास कदम म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.