Bhagatsingh koshiyari & Chhagan Bhujbal
Bhagatsingh koshiyari & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`भुजबळांनी संघर्ष खूप केला पण वाचन मात्र कमी`

Sampat Devgire

नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या (MCIAA) सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्ताने शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshiyari) आणि पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी अनुभवयास मिळाली. यावेळी दोघांनीही एकमेकांना चांगलेच राजकीय चिमटे (Tweezers) काढले.

महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या कार्यक्रमात श्री. भुजबळ व राज्यपाल कोश्यारी यांच्या भाषणातील परस्‍परांना चिमटे काढले. कार्यक्रमानंतरही उभयामधील राजकीय चिमट्यांची चांगलीच चर्चा रंगली.

..पण राज्यपालांच्या तोंडावर मुखपट्टी

पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, नाशिक इतके शांत आहे की, प्रभू श्रीराम राम फूल फॅमिली येथे राहिले. राज्यपालांनी नाशिकला रहायला यावे. असे निमंत्रण दिलेच सोबतच प्रभू श्रीरामांच्या नावाचा उपयोग लोक कशा-कशासाठी करतात. असे म्हणत पण आमच्या नाशिकच्या उद्योजक राम बंधूनी मात्र प्रभू रामांच्या नावाचा उपयोग चांगल्यासाठी केला. अनेकांना रोजगार देत महाराष्ट्रात मोठा विस्तार वाढविला, अशी धडाकेबाज सुरवात केली.

कोरोनातील मास्कचा संदर्भ देताना ते म्हणाले की, मास्कमुळे तोंड दिसत नाही. लोकांना उत्तर द्यावे लागत नाही. देणेकऱ्यांना टाळता येते, असे सांगताना भाषणाच्या ओघात विषय नोटाबंदीपर्यत नेला. नोटाबंदी आणि कोरोना संदर्भाचा लकब वापरून संदर्भ जोडत ते म्हणाले की, देशात नोटा बंदीमुळे अनेकांचे व्यवसाय मोडून पडले. अनेक कुटुंब उन्मळून पडले. पण राज्यपालांनी तोंडाला लावलेल्या पट्टीकडे पाहत राज्यपालांनी पण तोंडावर मास्क लावला आहे. ते आमचे चांगले मित्र असले तरी राजकीय मात्र काहीच ऐकत नाही, असा चिमटा काढला. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी मास्क काढत भुजबळांच्या विनोदाला दाद दिली.

भुजबळांचा संघर्ष मोठाच पण.....

अखेरच्या भाषण करतांना राज्यपाल कोश्यारी यांनीही त्यांच्या भाषणात भुजबळांना चिमटे काढले. जे जे मुंबई पुण्याला ते नाशिकला हवे या भुजबळांच्या मागणीचा संदर्भ देत त्यांनी असेच एक नेते उत्तराखंडला आहे. त्यांना जे चांगले आहे ते हवे असायचे पण अवकाळी गारा आणि उल्का सुद्धा त्यांना त्यांच्या मतदार संघात हव्या असायच्या. त्यानंतर मी आतापर्यंत फक्त विदर्भ आणि मराठवाडा अविकसित असल्याचे ऐकले. पण आता उत्तर महाराष्ट्रही अविकसित असल्याचे भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून ऐकले. म्हणजे आत्तापर्यंत बहुदा फक्त पश्चिम महाराष्ट्रातच विकास झाला का, असे भुजबळांकडे पाहात प्रश्न केला.

भुजबळांना वेदना जास्त कळतात. कारण संघर्ष करणाऱ्यांना वेदना जास्त कळतात. भुजबळांनी आयुष्यात संर्घषच जास्त केला त्यातुलनेत शिक्षण कमी झाले. राज्यपालांनी भाषणात मुहुर्ताचे महत्त्व सांगताना मुहूर्तावर विश्वास नाही, असे म्हणणारेही चांगल्या कामासाठी चांगले मुहूर्त शोधतात. काही कम्युनिस्ट नेत्यांची उदाहरण आहे, असे म्हणत भुजबळ साहेब आपण मुहूर्तावर विश्वास ठेवता का? असे विचारले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT