MLA Sangram Jagtap  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangram Jagtap Big Statement : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापाचं मोठं विधान; म्हणाले, '' नगरच्या नामांतराला विरोध नाही,पण...''

Ahmednagar Politics : '' दंगली घडविण्याचे विरोधकांचे राजकारण...!''

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar : औरंगाबद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली होती. या नामांतराच्या घोषणेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप मोठं विधान केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांनी शहरातील अशांतता, वाढती गुंडगिरी, तसेच विकासकामे, राजकारण आदी मुद्द्यांवर ‘सकाळ’च्या माध्यमाशी संवाद साधला. जगताप म्हणाले, भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्हा मोठा आहे. त्यामुळे शासकीय अडचणी अनेक आहेत. नामांतराला कोणाचाही विरोध नाही, मात्र, आधी विभाजन व्हायला हवे. कारण, नंतर नावावरून वाद निर्माण होऊ शकतात. यापूर्वी ठाणे जिल्ह्यातून पालघर वेगळा झाला. त्याचवेळी नगरचे विभाजन होऊ शकले असते. केवळ राजकीय उदासिनतेमुळे विभाजनाचे घोंगडे भिजत पडले आहे असल्याचंही जगताप म्हणाले.

गुन्हेगारी(Crime) आटोक्यात आणण्यासाठी काय कराल? या प्रश्नावर आमदार संग्राम जगताप म्हणाले, शहरात शांतता व सलोखा राहण्यासाठी कायम प्रयत्न असतो. काही राजकीय विरोधक अनुचित प्रकार घडवून आणतात. पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करावी. ज्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत, त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात यावे. शहराला बदनाम करून काहीही साध्य होणार नाही.

शहराचा तोंडावळा बदलला....

शहरात विकासासाठी उद्योग वाढण्याची गरज आहे. त्यासाठी पोषक वातावरण हवे, यासाठी माझा कायम प्रयत्न असतो. गेल्या दहा वर्षांत पाहिले, तर उपनगरे वाढली. लोकवस्ती वाढली. शहर शांत आहे म्हणूनच हे होत आहे. शहर झपाट्याने विकसित होत असल्याने पुण्याचे बांधकाम व्यावसायिक येथे येत आहेत. ही संख्या वाढत आहे. नगरमध्ये मोठे प्रोजेक्ट होत आहेत. लवकरच शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल. गुन्हेगारी किंवा दंगलीचा शिक्का शहराला मारण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे आवाहनही जगताप यांनी केले.

नगरसेवकांनो, रस्त्यांचे पालक व्हा !

शहरातील रस्त्यांसाठी सुमारे ५० कोटींचा निधी आणला. महापालिका प्रशासन, नगरसेवकांनी त्याचा विनियोग व्यवस्थित करायला हवा. मोठ्या रस्त्यांची कामे चांगली झाली. मुख्य शहरातील रस्त्यांबाबत संबंधित नगरसेवकांनी अधिक प्रयत्न करायला हवा. भूमिगत कामे वेगाने व्हावीत. त्यानंतर रस्तेही चांगले होतील. शहरातील पाणीप्रश्न आता सुटत आहे. अमृत योजनेमुळे अनेक प्रभागांत मुबलक पाणी मिळत आहे. ५० वर्षांत लोकसंख्या वाढली; परंतु पाण्याची आवक वाढली नव्हती. आता हा प्रश्न सुटत आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

आरोग्याच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधांयुक्त रुग्णालयासाठी २८ कोटी शासनाकडून मिळविले. महापालिकेच्या माध्यमातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. लवकरच हे काम होऊन आरोग्यसुविधा मिळतील.

विमानतळ, मेट्रो हवे !

शहरापासून जवळच असलेल्या बाबुर्डी परिसरात विमानतळ होणार होते. त्याचे सर्वेक्षणही झाले होते; परंतु काही राजकीय नेत्यांनी ते उत्तरेत नेले. केवळ शिर्डीपुरताच त्याचा फायदा होत आहे. ते विमानतळ शहराच्या जवळ झाले असते, तर औद्योगिक वसाहत वाढली असती. आयटी पार्क, मोठे प्रकल्प नगर शहराजवळ आले असते. भविष्यात विमानतळ(Airport), मेट्रो यायला हवी. हे सर्व जिल्ह्याचे विभाजन झाल्याशिवाय होणार नाही, याकडेही संग्राम जगताप यांनी लक्ष वेधले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT