Radhakrishna Vikhe 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe : राहुल गांधींनी शिर्डीतील 'त्या' 7 हजार मतांचा मुद्दा काढताच विखेंचा पारा चढला; म्हणाले, 'त्यांनी जो शोध लावलाय...'

BJP minister Radhakrishna Vikhe Congress Rahul Gandhi Shirdi voters Lok Sabha speech : राहुल गांधी यांनी लोकसभेत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानावर बोलताना शिर्डीचा दिलेल्या दाखल्यावर मंत्री राधाकृष्ण विखेंनी प्रतिहल्ला चढवला.

Pradeep Pendhare

Mumbai News : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा होताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणात नवे काहीच नव्हते, असा टोला लगावला. याचवेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड आहे, असे सांगताना शिर्डीतील एका इमारतीत सात हजार मतदारांची नोंदीचा उल्लेख केला.

राहुल गांधींच्या या आक्षेपावर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पलटवार केला आहे. राहुल गांधींनी हा शोध कुठून लावलाय, त्याचा शोध आता मी घेतोय, अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्री विखेंनी दिली आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, "राहुल गांधींनी (Rahul Gandhi) लोकसभेतील भाषणाता शिर्डीतील एका इमारतीत सात हजार मतदारांची नोंद झाल्याचा उल्लेख केला आहे. हा शोध कुठून लावलाय त्याचा शोध आता मी घेतो आहे. कोणतेही विधान करण्यापूर्वी त्यांनी भान ठेवायला हवं, असं मला वाटतं". भाजपला मिळालेलं जनादेश याचं दुःख विरोधी पक्षाला आहे, असाही टोला मंत्री विखेंनी लगावला.

'ज्यांनी जनाधार गमावलाय ते आता अशा प्रकारे जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या जिल्ह्यात देखील अनेक प्रस्थापितांना लोकांनी घरी बसवलं आहे, असे म्हणत नाव न घेता काँग्रेस बाळासाहेब थोरात यांना देखील भाजप (BJP) मंत्री विखे यांनी टोला लगावला आहे. आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी ते धडपड करत आहे. येणाऱ्या निवडणुका देखील महायुतीचे वर्चस्व राहील यात शंका नाही, असाही विश्वास मंत्री विखे यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी काय म्हणाले होते

लोकसभेमध्ये इंडिया आघाडीला चांगला यश मिळाले. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हिमाचलची जेवढी लोकसंख्या आहे, तेवढे 70 लाख मतदार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अवघ्या पाच महिन्यात वाढले. पाच वर्षांत जेवढी नोंद झाली नाही तेवढी अवघ्या पाच महिन्यात झाली. शिर्डीमधील एका इमारतीमध्ये सात हजार मतदारांची नोंद झाली आहे. मी कोणता आरोप करत नाही. काहीना काहीना तरी गडबड आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

शिर्डीतील घटना दुर्दैवी

अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता यावर आता विचार करणे गरजेचे आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांना कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढच्या आठ दिवसात शिर्डीत कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना जेरबंद करावे, या घटनेत कोठे पोलिसांचा हलगर्जीपणा असेल, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारांना आसरा देणारे राजकीय व्यक्ती असतील, तर त्यांच्यावर देखील कारवाई करू, असा इशारा मंत्री विखे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT