जळगाव : मी राजकारणावर बोलणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजपच्या (BJP) खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) या आता राज्यातील सरकारवर संतप्त झाल्या आहेत. अधिकारी पालकमंत्र्यांचे ऐकत नाहीत हे कसले सरकार आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली असून, शिवसेनेचे (Shivsena) नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनाही टोला लगावला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या फारशी राजकीय टीका करीत नाहीत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट राज्य सरकारवर टीका केली आहे. खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी अर्ज भरता येत नाही, असे म्हणणारे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनाही त्यांनी चांगलाच टोला लगावला आहे.
जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज झाली. त्यानंतर रक्षा खडसे या पत्रकारांशी बोलत होत्या. शेतकऱ्यांची वीज जोडणी बंद करण्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मागची जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली तेव्हा सर्व आमदारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या संदर्भात आग्रह केला होता. दोन बिलांऐवजी किमान एक बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापू नये, असे सगळ्यांनी सुचविले होते. त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वीज मंडळ अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही नंतर अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
आता पालकमंत्र्यांचेच अधिकारी ऐकत नसतील त्याला काय म्हणावे. सरकारमधील मंत्र्यांचे अधिकारीच ऐकत नाहीत तर हे कसले सरकार आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आज शेतकऱ्यांना विजेची गरज आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ते जबाबदारी स्वीकारीत नसतील तर अवघड आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.