Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : जरांगेमध्ये काही दम राहिला नाही, सगळी हवा गेली : भुजबळांनी डिवचलं..

Chhagan Bhujbal on Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. त्यावरुन भुजबळांनी टीका केली आहे.

Ganesh Sonawane

Chhagan Bhujbal : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलक मुंबईत धडकणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी पत्रकारांनी विचारले असता राष्ट्रवादीचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. भुजबळ म्हणाले, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मी जरा सुद्दा किंमत देत नाही. मराठा समाजाला सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलंच आहे. संपूर्ण मराठा समाजाला कळून चुकलंय की या जरांगेमध्ये काही दम राहिलेला नाही अशी बोचरी टीका भुजबळांनी केली.

भुजबळ हे माढामधील अरण गावामध्ये श्रीफळ दही हंडी सोहळ्याला गेले असताना बोलत होते. भुजबळ पुढे म्हणाले, दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वांना सांगितलं आपल्याला उमेदवार उभे करायचे आहेत. सर्वांचे फॉर्म मागितले. मग सांगितले की मी ठरवतो. त्यानंतर सांगितले माघार घेतली. ते फक्त माझ्या मतदार संघात येवल्यामध्ये आले, पण लोकांनी काही त्यांचं ऐकलं नाही, मला चांगल्या मतांनी निवडून दिलं, असं भुजबळ म्हणाले.

दरम्यान छगन भुजबळ यांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. भुजबळांनी सुरुवातीपासून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केलेला आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंतरवाली सराटीतून आंदोलनाला सुरुवात केली. अनेक उपोषणे केली. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला. परंतु छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्या मागणीला विरोध करत त्यांना शिंगावर घेतलं.

दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहे. अशात जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. यावेळचा मोर्चा पूर्वीच्या मोर्चापेक्षा पाच पट मोठा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांचा मोर्चा येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT