Dr. Bharati Pawar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dindori constituency 2024 : राष्ट्रवादीचा सडेतोड प्रश्न, 'अहो, भारतीताई पाच वर्षांत कांदा प्रश्नावर काय केले'..?

Sampat Devgire

Dr. Bharati Pawar News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणूक कांद्याच्या प्रश्नाभोवती फिरत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची चांगलीच कोंडी केली आहे. पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी किमान संसदेत कांद्याची माळ तरी गळ्यात घातली पाहिजे होती ,अशी टीका त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चांदवड तालुका अध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना दहा प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि मतदारांमध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे.

दिंडोरी मतदारसंघात हजारो कांदा उत्पादक शेतकरी आहेत. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने राबविलेल्या धोरणांमुळे ते कफल्लक झाले आहे. आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या मुलाबाळांची लग्न होत नाहीत. बँकांचे कर्ज फिटत नाही. यासाठी केवळ केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे. यावर पाच वर्षांत आपण काय केले? त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला? हे सांगावे, असे आव्हान दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. गायकवाड म्हणाले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी किमान संसदेत एकदा तरी कांद्याची माळ घालायला पाहिजे होती. तसेही घडलेले नाही. कांदा पिकवण्यासाठी हेक्टरी लाख रुपये खर्च येतो त्यावर सरकार 18 हजार जीएसटी (GST) घेते.शेतकऱ्यांना सहा हजार रुपये कशासाठी वाटप करते. बी बियाणे आणि शेतीच्या अवजारांवर सरकार 18% जीएसटी का घेते यावर कधी भूमिका घेतली आहे का?.

ते म्हणाले, नाफेड कडून कांदा खरेदी करण्यासाठी आपण आणि आपल्या कुटुंबीयांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या स्वतःच्याच कंपन्या काढल्या. त्यातून शेतकरी (Farmer) व शासनाची लूटमार करण्याचे धोरण अवलंबले घाऊक व्यापाऱ्यांवर धाडी टाकून दहशत निर्माण केली. जाणीवपूर्वक कांद्याचे दर पाडले. हे आता शेतकऱ्यांना कळले आहे. केवळ शेतकरी विरोध हेच धोरण मोदी सरकारने राबविले आहे. त्यावर आपण काय मत नोंदवले? हे जाहीर करावे, असे गायकवाड यांनी सांगितले.

आमच्या प्रत्येक गावात राम मंदिर आहे. आम्हाला अयोध्येतील राम मंदिर नको. 370 कलमसुद्धा गरजेचे नाही. आमच्या मुला बाळांना नोकरी-धंदा, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा महत्त्वाच्या आहेत. तुमची कोणतीही गॅरंटी आम्हाला नको आहे. कारण 2014 च्या निवडणुकीचा अनुभव असल्याने त्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT