Girish Mahajan, Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election: खडसे रिकामे आहेत, मला खूप कामे आहेत; गिरीश महाजनांची बोचरी टीका

सरकारनामा ब्यूरो

Girish Mahajan On Eknath Khadse: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते एकनाथ खडसे यांची (Eknath Khadse) भाजपमध्ये घरवापसी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. शिवाय खुद्द खडसे यांनीदेखील आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे. पण खडसे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असले, तरीही मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद काही कमी झाल्याचं दिसत नाही.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) रिकामे आहेत, त्यांच्या सर्व प्रश्नांवर बोलण्यासाठी, उत्तर देण्यासाठी मी रिकामा नाही, माझ्याकडे चार-पाच जिल्ह्यांची जबाबदारी आहे. असं म्हणत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंवर पुन्हा एकदा टीका केली आहे. जळगावमध्ये आलेल्या महाजन यांना माध्यमांनी खडसेंबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ही टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाजन म्हणाले, मला खूप कामे आहेत त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. एकनाथ खडसे रिकामे आहेत, पण मी रिकामा नाही. एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार असले तरीही त्यांच्यावर टीका करण्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी टाळलेलं दिसत नाही. त्यामुळे खडसे भाजपात (BJP) आल्यावर तरी या नेत्यांचं पटेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खडसेंची थेट वरती हॉट लाईन आहे

तसेच एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता महाजन म्हणाले, "ते मोठे नेते आहेत त्यांनी सांगितले की, खालच्या स्तरावर त्यांचा कुठेही संपर्क नाही. त्यांची थेट वरती हॉट लाईन आहे. त्यामुळे त्याबाबत तेच सांगू शकतील. याबाबतीत आम्हाला अजून बोलवणं आलेलं नाही. ज्या दिवशी बोलवणं होईल त्या दिवशी बोलू."

महायुतीमध्ये कुठलीही नाराजी नाही

महायुतीमध्ये कुठलीही नााराजी नाही, सर्व पक्ष युतीत एकत्र आहेत. 22 तारखेला जळगाव आणि रावेर (Jalgaon and Raver) या दोन्ही लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील उमेदवारांचा अर्ज भरला जाणार आहे. या दिवशी होणारी गर्दी बघून तुम्हाला कळेल की, आम्ही किती मताधिक्याने या जागा जिंकू. तसेच राज्यातील पाच-सहा ठिकाणी जागावाटपावरुन वाद आहे. मात्र तीन्ही पक्ष एकत्र आहेत.

आमचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित दादा हे तिघे असून जागांबाबतचा निर्णय ते घेतील. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. आमच्यात कुठेही दुमत नाही. शिवाय मागील वेळेप्रमाणे यावेळी सुद्धा उत्तर महाराष्ट्रातल्या आठच्या आठ जागांवर भाजपच्या तसेच मित्र पक्षांच्या उमेदवारांना जनता निवडून देईल, असा विश्वासही महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT