Nashik Kumbh Mela Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : पुरोहित चालतात मग साधु-महंत का नको? कुंभमेळ्यावरुन फडणवीसांच्या पुढ्यात नवा सवाल

Devendra Fadnavis Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या प्रभावी नियोजनासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या शिखर समितीच्या घोषनेनंतर कुंभमेळ्याच्या आखाड्यात नव्या वादाने उडी घेतली आहे.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela : नाशिक व त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर आल्याने कुंभमेळ्याचे उत्कृष्ट नियोजन व प्रभावशाली अंमलबजावणी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती गठित करण्यात आली आहे. परंतु या शिखर समितीच्या घोषनेनंतर कुंभमेळ्याच्या आखाड्यात नव्या वादाने उडी घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या या शिखर समितीत पुरोहित संघांचा समावेश करण्यात आला आहे, परंतु साधु-महंतांचा समावेश नसल्याने नाशिक व त्र्यंबकेश्वर दोन्ही ठिकाणच्या आखडाप्रमुख, ठाणापतींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शिखर समितीत 'पुरोहित' चालतात मग साधु-महंत का नको, असा प्रश्न महंतांनी उपस्थित केला आहे. अर्थातच शिखर समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने त्यांनाच या प्रश्नाचे उत्तर देऊन महंतांची नाराजी आता दूर करावी लागणार आहे.

शिखर समितीत राज्यातील अनेक नेत्यांचा समावेश आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री या समितीच्या उपाध्यक्षस्थानी आहेत. प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकारी, खासदार, आमदारांसह पुरोहित संघाचा समावेश या समितीत करण्यात आला आहे. परंतु नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या एकाही आखाड्याचा यात समावेश नसल्याने महंतांनी शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत थेट सवाल केला आहे.

यासंदर्भात चर्चा करण्यासाठी नाशिकचे महंत भक्तिचरणदास व त्र्यंबकेश्वरचे महंत शंकरानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. २०) त्र्यंबकेश्वरला ब्रह्मदर्शन आश्रमात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महंतांनी शिखर समितीत समावेश न केल्याने शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

राज्य सरकारने राजकीय नेत्यांना घेऊन कुंभमेळ्यात राजकारण आणू नये. कुंभमेळा हा साधु-महंतांचा असून, त्यांच्या दर्शनासाठी भाविक येतात. सरकारने याचे गांभीर्य ठेवून समितीत त्यांचा समावेश करायला हवा होता. आम्हाला डावलून पुरोहितांचा समावेश होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा या बैठकीत महंत शंकरानंद सरस्वती यांनी दिला. नाशिकची बैठक ही नाशिकच्या साधू-महंतांसाठी राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरला यावे आणि साधू-महंतांची बैठक घ्यावी, असा आग्रह महंत शंकरानंद सरस्वती यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT