bjp congress sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : भाजपकडून 'वोट जिहाद'चा आरोप, काँग्रेसकडून जशास तसं प्रत्युत्तर

Sampat Devgire

Nashik News : भारतीय जनता पक्षाचे ( bjp ) महाराष्ट्राचे प्रभारी डॉक्टर दिनेश शर्मा यांनी काँग्रेसवर आरोप केला होता. या आरोपाचा काँग्रेस ( Congress ) नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या बेजबाबदार विधानांचा संबंध काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची जोडला आहे.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात ( Lok Sabha Election 2024 ) दिनेश शर्मा नाशिक येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर टीका केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष 'वोट जिहाद'सारख्या प्रकाराला प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. काँग्रेस पक्षावर केलेल्या आरोपाचा पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी चांगलाच समाचार घेत दिनेश शर्मा यांना चोख उत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'"इस बार चारसो पार" अशा काल्पनिक घोषणा देत लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या भारतीय जनता पक्षाचे पितळ उघडे पडले आहे. मतदारांनी त्यांचे कार्यक्रम आणि धोरणांमुळे स्पष्टपणे भाजपला नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात त्यांना कुठेही जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या पक्षाचे नेते आता वाटेल तसे आरोप करू लागले आहेत. त्यात कुठलेही तथ्य नाही. त्यामुळे जनता त्यांना मतदानातून उत्तर देईल," असा दावा नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी केला आहे.

छाजेड म्हणाले, "जिहाद या शब्दाचा वापर करून विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. या माध्यमातून सामाजिक वातावरण आणि सौहार्द बिघडविण्याचा त्यांचा डाव आहे. मात्र, नाशिक शहर हे सामाजिक सलोखा आणि ऐक्याचे वातावरण असलेले शहर आहे. या शहरात सामाजिक सलोखा उत्तम आहे. नागरिक भाजपच्या आरोपातून हा सलोखा अजिबात बिघडवणार नाहीत."

"भारतीय जनता पक्षाने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, अशी विधाने सातत्याने केली आहेत. यामागे त्यांना भारतीय जनता पक्षाकडून निर्माण केलेल्या महागाई, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी, महिलांचे संरक्षण, भ्रष्टाचार आदी प्रश्नांवर पांघरून घालायचं आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांचा ह्या सर्व खटाटोप सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा आहे. जनतेला हे पुरते समजले आहे," असं आकाश छाजेड यांनी म्हटलं.

"लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे भाजपने सातत्याने अल्पसंख्याकांना डोळ्यापुढे ठेवून सामाजिक थेट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे," असा आरोपही छाजेड यांनी केला.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT