dr. Subhsh Bhamre - Rahul Gandhi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon City Politics : मालेगावमध्ये राहुल गांधींचे खटाखट.. खटाखट.. डॉ. भामरेंना बसवणार घरी?

Sampat Devgire

Dhule constituency 2024 : भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक ध्रुवीकरणाला तेवढ्याच त्वेषाने उत्तर देणारा मतदारसंघ म्हणजे मालेगाव मध्य. येथील मतदार म्हणतात 4 जूनला भाजपचे डॉ सुभाष भामरे यांना आम्ही पहिल्या दोन तासातच घरी बसवणार.धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव लढत देत आहेत.या दोघांचेही भवितव्य यंदा मालेगाव मध्येचे मतदार ठरवणार आहेत.

धुळे लोकसभा मतदारसंघात यंदा 70.21 टक्के मतदान झाले. यामध्ये 12 लाख 17 हजार 523 मतदारांनी मतदान केले. यामध्ये सर्वाधिक 68.04 टक्के मतदान मालेगाव मध्य मतदार संघाचे आहे. येथे दोन लाख पाच हजार 759 मतदारांनी मतदान केले. मालेगाव शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हटले जाते. हजारो कामगार येथे सुताच्या गिरणीवर काम करतात. या मुस्लिम बहुल शहराचा मतदानाचा ट्रेंड लक्षात घेतल्यास धुळे मतदार संघाचा निकाल देखील लगेच डोळ्यापुढे येतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मालेगाव शहरात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांना एक लाख 93 हजार मते मिळाली होती. भाजपचे डॉक्टर भामरे यांना अवघे 5 हजार मते होती. यंदा या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. येथील जाणकार, राजकीय कार्यकर्ते यांचा दावा आहे की, यंदा दोन लाख पाच हजार मतांपैकी भाजपला जास्तीत जास्त दहा हजार मते मिळतील. आम्ही काँग्रेस पक्षाला दिलेली मताधिक्य भाजप उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील मोडू शकणार नाही एवढे असेल.

हे चित्र निर्माण होण्याची कारणे ही तशीच आहेत. येथे एमआयएम पक्षाचे मौलाना मुक्ती आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे माजी आमदार आसिफ शेख आहेत. मात्र यंदा एमआयएम पक्षाने उमेदवार देऊन मत विभागणीचे राजकारण टाळले. वंचित आघाडीने येथे असाच प्रयोग केला. मात्र त्यांचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा अर्ज फेटाळण्यात आला.त्यामुळे येथे मत विभागणीचे कोणतेही कारण शिल्लक राहिले नाही.

याशिवाय येथे काँग्रेस (Congress) आणि समाजवादी पक्ष देखील प्रमुख आहेत. काँग्रेसचे नेते शेख जलील यांसह शेख असिफ, मुस्टकीम डीग्नीटी, शान ए हिंद, डॉ.खालिद परवेज यांसह विविध नेत्यांनी काँग्रेस पक्षासाठी जोर लावला होता त्यांच्या दृष्टीने उमेदवार दुय्यम तर काँग्रेसची सर्वधर्मसमभावाची विचारधारा महत्वाची होती. भारतीय जनता पक्षाकडून अल्पसंख्याकांची होणारी सततची हेटाळणी आणि द्वेष याला त्यांना उत्तर द्यायचे होते. त्यामुळे उत्स्फूर्तपणे लोकांनी मतदान केले.

मालेगाव शहरातील यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची स्थिती पाहिल्यास काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेले खटाखट, खटाखट, खटाखट हे विधान येथे तंतोतंत लागू होते. मतमोजणीच्या दिवशी पहिल्या दोन तासांतच असे आकडे बाहेर येतील की, कदाचित भाजपचे डॉ.सुभाष भामरे यांना दिल्ली विसरून घरी बसावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये काँग्रेस उमेदवाराचे श्रेय कमी आहे. मात्र भाजपने केलेले राजकारण मुख्य कारण असेल, असे म्हणता येईल.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT