Lok Sabha Election 2024 : काँग्रेसनं 4 जूनला गुलाल उधळण्याची केली तयारी; कार्यकर्त्यांना केलं आवाहन

Congress Politics : निवडणूक मतमोजणी आधीच महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा आत्मविश्वास काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.
Akash Chhajed
Akash Chhajed Sarkarnama

Nashik Congress News : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha election 2024) महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. आता मतदारांसह सर्व राजकीय पक्षांना चार जूनचे वेध लागले आहेत. राज्यभरातील अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी तर आपल्या नेत्यांचे खासदार म्हणून फ्लेक्स लावायला सुरूवात केली आहे. मागील निवडणुकीत केवळ एकच खासदार निवडून आणू शकलेली काँग्रेसही (Congress) यामध्ये मागे नाही. ठिकठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी विजय गुलाल उधळण्याची तयारी सुरू केली आहे.

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने नंदुरबार (Nandurbar) आणि धुळे (Dhule) या आपल्या परंपरागत लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिले होते. नंदुरबार येथे गोवाल पाडवी (Gowal Padvi) आणि धुळे येथे डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bhachav) महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात काँग्रेस पक्षाच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. या प्रचाराच्या नियोजनात देखील त्यांची महत्त्वाची भूमिका होती. (Latest Political News)

Akash Chhajed
Jalgaon Constituency News: जळगावच्या मतदारांना भाजपच्या फोडाफोडीचे राजकारण नापसंत?

या पार्श्वभूमीवर नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड (Akash Chhajed) यांनी बुधवारी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिक, दिंडोरी, धुळे आणि नंदुरबार अशा सर्व मतदारसंघात कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन प्रचार केला आहे. काँग्रेस पक्षाची धोरणे आणि भारतीय जनता पक्षांनी देशात केलेली जनविरोधी कृत्य मतदारांपर्यंत पोहोचवली. त्याला मतदारांचा देखील प्रतिसाद मिळालेला आहे, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. (Congress Latest News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नंदुरबार येथे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची सभा झाली. ही सभा अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाली. सभेला हजारो मतदारांनी गर्दी केली होती. त्यामुळे ही सभा नंदुरबारच्या काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यात मोठी भूमिका पार पाडणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी धुळे येथे सभा घेतली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारातील त्रुटी वेळीच दूर केल्या. चांगला समन्वय निर्माण केला. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचा विविध पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले, असे छाजेड म्हणाले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांचं विविध नेत्यांच्या अथक परिश्रम आणि प्रचाराने यंदा देशात भाजपचे जनविरोधी सरकार पराभूत होणार आहे. लोकांच्या हिताचे आणि त्यांच्या मनातले इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. आपल्या नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार हे चारही उमेदवार निश्चितपणे विजयी होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी गुलाल उधळण्यासाठी चार जूनला यावे, असे आवाहन या पत्रात करण्यात आले. निवडणूक मतमोजणी आधीच महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा आत्मविश्वास काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

Akash Chhajed
Maharashtra Politics : 'दिल्ली'नंतर आता 'गल्ली'चे वेध; उमेदवारीसाठी इच्छुकांची चाचपणी सुरु

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com