Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate Politics: माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद थोडक्यात वाचले, ‘हे’आहे कारण!

Manikrao Kokate; I have the right to seek justice and will appeal-न्यायालयाने दोन वर्षे शिक्षा ठोठावल्यावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Sampat Devgire

Manikrao Kokate News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर फसवणूक आणि खोटी कागदपत्र केल्याचा गुन्हा सिद्ध झाला. त्यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत कृषी मंत्री कोकाटे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

नाशिकच्या न्यायालयाने मंत्रीपदी राहिलेल्या नेत्यांना शिक्षा करण्याचे हे दुसरे प्रकरण आहे. यापूर्वी बच्चू कडू यांना अधिकाऱ्यांना मारहाण केल्याने नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा दिली होती. आता माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली आहे.

यानिमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विषयी केंद्र सरकारने केलेल्या सापत्न वागणुकीची चर्चा झाली. राहुल गांधी यांना गुजरातच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी केंद्राने अतिशय वेगाने कार्यवाही करून त्याच दिवशी त्यांची खासदारकी व दिल्लीतील निवासस्थान परत घेतले होते. कृषिमंत्री कोकाटे मात्र याबाबत नशिबवान ठरले आहेत.

कृषिमंत्री कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय यांनी १९९५ मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छा निधीतील दहा टक्के आरक्षित सदनिका मिळवली होती. त्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्र केल्याचा आरोप होता. त्याबाबत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश रूपाली नरवाडिया यांनी त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला.

ही शिक्षा झाल्यानंतर कृषिमंत्री कोकाटे यांच्या वकिलांनी तातडीने जामण्यासाठी अर्ज सादर केला. त्यांना पंधरा हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला. त्यांनी तातडीने उच्च न्यायालयात या निकालाविरुद्ध दाद मागितली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार शिक्षेला स्थगिती मिळाल्यास त्यांची आमदारकी शाबूत राहणार आहे. शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर कोकाटे यांची आमदारकी आणि पर्यायाने मंत्रीपद देखील धोक्यात आले असते.

या संदर्भात न्यायालयाने कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर अतिशय गंभीर ताशेरे ओढले आहे. त्यांनी जाणीवपूर्वक आणि वकील म्हणून कायद्याचे पूर्ण ज्ञान असताना हा गैरप्रकार केला आहे. त्यांनी व त्यांच्या भावाने असे केल्याने दोन गरजू लोक घरापासून वंचित राहिले. सामान्य माणूस आयुष्यात घराचे स्वप्न पाहत असताना सत्तेवर असलेल्या कृषिमंत्री कोकाटे यांनी गरीब आणि गरजूंचा हक्क हिरावला आहे, असे निकाल पत्रात नमूद आहे.

यावर कृषिमंत्री कोकाटे यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, निकालाच्या अभ्यासानंतरच मी प्रतिक्रिया व्यक्त करू शकेल. मात्र मला देखील न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहे. हे प्रकरण अतिशय जुने आहे, असे ते म्हणाले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT