Maratha and Adivasi protesters gear up for massive demonstrations in Mumbai, putting Devendra Fadnavis under intense political pressure. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मराठ्याचं वादळ पोहचलं, आता आदिवासीचं बिऱ्हाड मुंबई गाठण्याच्या तयारीत; फडणवीसांची मोठी कोंडी

Maratha protest, Adivasi protest : एकीकडे मराठा आंदोलक मुंबईत पोहचले आहेत. तर दुसरीकडे नाशिकमध्ये ठाण मांडून असलेलं आदिवासीचं बिऱ्हाड मुंबई गाठण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे फडणवीसांचा मोठा कस लागणार आहे.

Ganesh Sonawane

Devendra Fadnavis : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे. जरांगे यांच्या नेतृत्वात राज्याच्या कानाकोपऱ्यातील मराठा बांधव मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत.

आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं आहे. राज्य शासनाने आझाद मैदानावर उपोषणासाठी एक दिवसाची परवानगी दिली आहे. परंतु सरकारने आता गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

जरांगे पाटील यांनी या आंदोलनाच्या सुरुवातीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलेलं आहे. विनाकारण मराठा विरोधी भूमिका सोडून द्या, अन्यथा पुढच्या येणाऱ्या दिवसांत तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल असा इशाराच जरांगेंनी फडणवीसांना दिला आहे.

तर दुसरीकडे नाशिक शहरात ५२ दिवसांपासून आदिवासी बांधवांचे आयुक्तालयासमोर बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. आंदोलक काही केल्या मागे हटायला तयार नाही. आदिवासी विकास विभागातील बाह्यस्त्रोतांद्वारे होणारी भरती थांबवावी, या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. आंदोलकांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांची भेट घेतली होती. मात्र, अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.

५२ दिवस झाले आंदोलन सुरु आहे, मात्र तोडगा न निघाल्याने व होत असलेल्या विलंबामुळे आंदोलकांनी वारंवार आपला रोष व्यक्त केला. आयुक्तालयासमोर निदर्शनेही केली. तरी प्रश्न सुटलेला नाही. रोजंदारी कर्मचारी आजही ठिय्या मांडून बसले आहेत. बिऱ्हाड आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी समाजाचे आमदार आज शुक्रवार (दि. २९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यामुळे काय निर्णय होतो यावर आंदोलकांच्या नजरा आहेत.

परंतु आमदारांच्या पातळीवरही समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर बिऱ्हाड आंदोलक मुंबई गाठण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती ललित चौधरी यांनी दिली. त्यामुळे मराठ्यांपाठोपाठ आदिवासीही मुंबई गाठण्याच्या तयारीत असल्याने फडणवीसांची मोठी कसोटी लागली आहे. दोन्हीकडून फडणवीसांची कोंडी होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT