BJP Politics; Ravindra Chavan sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Nashik : भाजपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, नाशिकमध्ये प्रचाराचा नारळ फोडायला आलेले प्रदेशाध्यक्ष नेमकं काय बोलून गेले..

Ravindra Chavan AB Form controversy : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी नाशिकमध्ये येत महापालिका निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. त्याचवेळी पक्षात एबी फॉर्म वाटपाच्या वेळी झालेल्या गोंधळावरही भाष्य केलं.

Ganesh Sonawane

Nashik Politics : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (दि. ४) नाशिकमध्ये येत निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. त्यांच्या उपस्थितीत शहरातील श्रद्धा लॉन्स येथे विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नाशिक भाजपमध्ये एबी फॉर्म वाटपावरुन उडालेला गोंधळ व झालेल्या राड्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

नाशिकमध्ये एबी फॉर्मचे वाटप करताना झालेला राडा, एबी फॉर्मची पळवापळवी, एकाच व्यक्तीकडे दिले गेलेले चार एबी फॉर्म, एकाच प्रभागात उमेदवारांनी दाखल केलेले दोन-दोन अर्ज व त्यामुळे पक्षातीलच उमेदवारांना पुरस्कृत करण्याची आलेली वेळ या घटनाक्रमावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घडलेल्या घटना अतिशय चुकीच्या असून भाजपच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

नाशिकमध्ये जे घडलं त्याची पक्षाने गांभिर्याने नोंद घेतली आहे. या संदर्भात स्थानिकांशी चर्चा आणि याचे काय परिणाम होतील, हा विचार करून दोषींवर कडक कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिला. झालेल्या गोंधळाबाबत त्यांनी दिलगीरी व्यक्त करत विजयासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या घरोघरी जावे असे आवाहन केले.

दरम्यान महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप फेटाळताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट भूमिका मांडली. भाजपसारख्या संघटनात्मक पक्षात अशा प्रकारच्या व्यवहारांना कधीही स्थान नव्हते आणि भविष्यातही राहणार नाही, असा ठाम दावा त्यांनी केला. भाजपमध्ये असे कधी होत नाही आणि होणार नाही अस त्यांनी स्पष्ट सांगितलं.

भाजप हा कार्यकर्त्यांच्या कष्टांवर उभा असलेला पक्ष असून, निवडणुकीत उमेदवारी मिळणे किंवा न मिळणे हा वेगळा विषय आहे. मात्र, उमेदवारी न मिळाल्यानंतर अशा स्वरूपाचे आरोप करणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. नाराज इच्छुकांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणावर सुरू असलेली चर्चा चुकीच्या दिशेने जात असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT