Vikhe Writes to Vaishnaw Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Pune railway route change : विखे पाटलांनी उचलला पेन, लिहिलं पत्र! आता अश्विनी वैष्णव यांच्या उत्तराची प्रतीक्षा...

Nashik–Pune Railway Route Change Vikhe Writes to Vaishnaw : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा बदलेल्या मार्गावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पत्र व्यवहार करत संभ्रम दूर करण्याची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी.

Pradeep Pendhare

Nashik Pune railway news : भाजपचे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा बदलेल्या मार्गावर थेट केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर पत्र लिहिलं.

मंत्री विखे पाटील यांनी या पत्राद्वारे एकप्रकारे नाराजीच व्यक्त केल्याचे दिसते. रेल्वे प्रकल्पासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधीना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही निर्णय करू नयेत, प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या बदलाबाबत झालेला संभ्रम दूर करण्यासाठी तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणीही मंत्री विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांच्याकडे या पत्राद्वारे केली आहे.

संसदेच्या अधिवेशनात पुणे नाशिक (Nashik) रेल्वे प्रकल्पाच्या झालेल्या चर्चे दरम्यान प्रस्तावित मार्गात बदल करून रेल्वे मार्ग शिर्डीहून प्रस्तावित केल्याची बाब समोर आल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातून सुरूवातीला ज्या भागातून हा मार्ग जात होता, तिथल्या लोकप्रतिनिधीसह नागरिकांमध्ये संताप अन् संभ्रम निर्माण झाला आहे. हा प्रश्न आता तापला असून, अकोलसह संगमनेरमधूनच हा मार्ग जावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी जनआंदोलन सुरू झालं आहे. याचे पडसाद नागपूर हिवाळी अधिवेशनात देखील उमटले.

या प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या आराखड्यानुसार नारायणगाव-संगमनेर-सिन्नर-नाशिक या भागातून रेल्वे मार्ग निश्चित करण्यात आला आहे. यासाठी जमिनीचे भूसंपादन देखील करण्यात आले होते. मात्र अचानक झालेला बदल सर्वानाच आश्चर्यकारक असल्याचे मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी पत्रात नमूद केला.

यापूर्वी तयार करण्यात आलेल्या रेल्वे प्रकल्पाच्या आराखड्यातील बदलाबाबत कोणतीही चर्चा जिल्ह्यातील लोकसभा आणि विधान सभेच्या सदस्यांशी करण्यात आलेली नाही. प्रकल्प मार्गातील बदल करताना लोकप्रतिनिधीना विश्वासात घेणे गरजेचे होते. परंतु तशी कोणतीही चर्चा न झाल्याने लोकप्रतिनीधीसह जनतेमध्ये रेल्वे मार्गाबाबत मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणाचा रोष लोकप्रतिनिधींना सहन करण्याची वेळ आल्याचे गांभीर्य मंत्री विखे पाटील यांनी रेल्वे मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले.

प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत पहिल्यापासून असलेली मागणी विचारात घेण्यासाठी आपण तातडीने सर्व लोकप्रतिनिधीची बैठक बोलवावी. तसेच लोकप्रतिनिधीना विश्वासात घेतल्याशिवाय नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत कोणताही निर्णय करू नयेत, अशी विनंती देखील मंत्री विखे पाटील यांनी पत्रातून केंद्रीय मंत्री वैष्णव यांना केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT