Sharad Pawar, Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? पाहा भुजबळांनी पवारांना कसं डिवचलं...

Avinash Chandane

Nashik Political News :

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ अजित पवारांसोबत गेले. तेव्हापासून भुजबळ वारंवार शरद पवारांवर टीका करत आहेत. आता तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अजित पवारांचा असा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यावरून भुजबळांनी पुन्हा शरद पवारांवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह सेटलमेंट करून देण्यात आले आणि असा निर्णय येईल, अशी खात्री होती, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत. विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय शिवसेनेसाठी दिला तसाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठीही दिला, अशी टीका शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली, हे अख्ख्या देशाला ठाऊक आहे. त्यामुळे हा पक्ष अन्य लोकांच्या हातात देण्याचा निर्णय अन्याय करणारा आहे, अशी टीका शरद पवारांनी बारामतीमध्ये केली.

एवढेच नाही तर या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. लोकसभा निवडणुकीपूर्वी यावर निर्णय घेण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे करणार आहोत, असेही पवारांनी स्पष्ट केले. ही टीका छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) झोंबली आहे.

पवारांच्या टीकेला भुजबळांचं उत्तर

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय कायद्यानुसार आहे की नाही, यासाठी पवार सुप्रीम कोर्टात जात आहेत ना? सुप्रीम कोर्टात न्यायाधीश आहेत, कायदेपंडित बसलेले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय उत्तर द्यायला पाहिजे, काय निर्णय घ्यायला पाहिजे ते सांगतील ना… सुप्रीम कोर्टात जाताय ना? तर जा की! असे प्रत्युत्तर भुजबळांनी शरद पवारांच्या टीकेला दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्या माणसाने पक्ष उभा केला, त्याच्या हातून पक्ष हिरावून घेतला गेला आहे. या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत, असे पवार म्हणाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या हातात गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत आले आहेत. या वेळी त्यांनी केंदीय निवडणूक आयोगाच्या निकालावर असहमती दर्शवली. ज्याने पक्षाची स्थापना केली, वाढवला त्याच्याकडून पक्ष हिरावून घेतला जातो. या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात गेल्याचे पवार म्हणाले आहेत.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT