Sanjay Raut | Raj Thackeray | Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut on Raj Thackeray : राज ठाकरेंची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा, संजय राऊतांनी फेकला नवा चेंडू

Maharashtra Politics: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला देखील सोबत घेणे गरजेचे आहे. असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra politics : गेल्या काही दिवसांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूची युती होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्यास त्यांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच आता ठाकरेंच्या फायरब्रॅण्ड नेत्याने केलेल्या दाव्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिकमध्ये बोलताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही,असे वक्तव्य केले होते. सपकाळ यांनी मनसेला युतीसाठी यातून अप्रत्यक्ष नकारच दिला. तसेच, महाविकास आघाडीत मनसेला घ्यायचे असल्यास तो निर्णय दिल्लीतून होईल, असेही सपकाळ म्हणाले होते.

मात्र आता यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी आज सोमवार (ता.१३) माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले मी तुम्हाला एक ब्रेकींग न्यूज देतो की, राज ठाकरे यांनी आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रत्येकाचे या राज्यात एक स्थान आहे. जसे, शिवसेना ठाकरे गट), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) या पक्षांसह डाव्या पक्षांचे वेगळे स्थान आहे. तसेच काँग्रेस हा देखील राज्यातील एक महत्वाचा पक्ष आहे. शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश होणे गरजेचे आहे. ही सर्वांचीच भूमिका असून राज ठाकरेंची सुद्धा तीच भूमिका असल्याचे राऊत म्हणाले. अर्थात ही त्यांची एक भूमिका आहे. मात्र, याचा अर्थ तो निर्णय नाही असही राऊत यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान महाविकास आघाडीत जर मनसेला घ्यायचे असल्यास तो निर्णय दिल्लीतून घेतला जाईल असे सपकाळ म्हणाले होते, त्यावर विचारले असता राऊत म्हणाले की, त्यांचे म्हणणे बरोबर आहे. दिल्लीत आमची कॉंग्रेसच्या हायकमांडसोबत चर्चा सुरु असल्याचे राऊत यांनी सांगितले. उद्याचे जे शिष्ट मंडळ आहे ते सर्वपक्षीय व अराजकीय शिष्टमंडळ आहे. हे सपकाळ यांनी समजून घेतलं पाहीजे.

दरम्यान तीन महिन्यांत वेगवेगळ्या कारणांनी ठाकरें बंधूंच्या सहा वेळा भेटी झाल्या आहेत.  काल (रविवार, दि.१२) रोजी देखील राज ठाकरेंनी सहकुटुंब उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’ येथे जाऊन भेट घेतली. त्यानंतर राऊतांनी केलेल्या वक्तव्याने, राजकीय वर्तुळात पुन्हा मनोमिलनाच्या चर्चांणा उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT