Raj Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray On MNS Party Workers : 'हे आता शेवटचे इंजेक्शन...' राज ठाकरेंचा सज्जड दम

Arvind Jadhav

Political News : राज ठाकरेंचे नाशिकवरील प्रेम सर्वश्रृत आहे. 2009 मध्ये पक्ष स्थापन केल्याबरोबर ठाकरे नाशिकला पोहचले होते. राज ठाकरेंना सर्वाधिक राजकीय यश नाशिकमधूनच मिळाले. मात्र, आता म्हणावी तशी साथ त्यांना नाशिकमधून मिळत नाही. याचमुळे राज यांनी ठाकरे शैलीत मनसे पदाधिकाऱ्यांचा समाचार घेत नाशिक ऑप्शनला टाकण्याचा सज्जड दमच भरला.

गटबाजी थांबवा. माझ्याकडे तक्रारी घेऊन येण्यापेक्षा पक्ष कामाकडे लक्ष द्या. हे आता शेवटचे इंजेक्शन आहे. यानंतर सुधारणा झाली नाही तर नाशिक मी ऑप्शनला टाकलेच म्हणून समजा. मी नाशिकला (Nashik) येत नाही त्याचे कारण तुम्हाला माहिती आहे काय,असा थेट सवाल राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. (Raj Thackeray On MNS Party Workers)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन शिबिरात बोलताना अगदीच ठाकरे शैलीत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. मी नाशिकला येत नाही, त्याचे कारण तुम्हाला माहिती आहे काय, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केला. यावेळी तुमचं नाशिकवर प्रेम आहे. मात्र, निवडणुकीत पक्षाला कमी मतदान झाले. त्यामुळे तुम्ही येत नाही, असे उत्तर पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र, हे चुकीचे असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

पक्षातील पदाधिकारी गटबाजी करतात. याबाबत मुंबईत तक्रारी घेऊन येतात. अनेकदा सुचना करूनही सुधारणा होत नाही. म्हणून मी नाशिक दौरे कमी केलेत असे राज ठाकरे म्हणाले. आता यावेळी आलो. हे शेवटच इंजेक्शन तुम्हाला देतो आहे. यापुढे सुधारणा करा. नवीन पदाधिकारी नियुक्त केले आहेत. ज्यांना पक्षासाठी काम करायचे त्यांनी करा अथवा पक्षातून बाहेर पडा. पक्षवाढीकडे लक्ष द्या. यात सुधारणा झाली नाही तर मी नाशिकला ऑप्शनला टाकेन,असा इशाराच ठाकरे यांनी दिला.

राज ठाकरेंना खंत...

नाशिकवरील राज ठाकरे यांचे प्रेम शिवसेनेत असल्यापासून आहे. त्याचमुळे राज ठाकरे यांनी 2009 मध्ये पक्ष स्थापन केल्यानंतर लगेच नाशिक गाठले होते. नाशिककरांनी त्यांना नाराज केले नाही. दोन आमदार आणि महापालिकेत तब्बल ४० नगरसेवक निवडूण दिले. मात्र, यानंतर सुरू झालेल्या गटबाजीने पक्षाचा घात केला. पक्षाचे अनेक पदाधिकारी बाहेर पडले. अनेक दौरे करूनही पक्ष वाढ होत नाही. यश मिळत नाही, हीच खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT