Narendra Modi, Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Vs Narendra Modi : नरेंद्र मोदींचा सत्य बोलण्याशी काही संबंध नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

कैलास शिंदे

Jalgaon Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सत्य बोलणे’ याच्याशी काहीही संबध नाही. त्यांनी 2014 ला महागाई, बेरोजगारी कमी करण्याचे तसेच शेती मालाला भाव देण्याचे आश्‍वासन दिले होते, परंतु ते आजही पूर्ण झालेले नाही. ते फक्त विरोधकांवर टीका करीत आहेत. माझ्यावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय तर त्यांना झोप येत नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केला आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार Sharad Pawar गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी पवारांनी भाजप, पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेसाठी कधीही सत्तेचा उपयोग केलेला नाही. महागाई कमी करू, या देशात दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी दहा वर्षात यातील काहीही केलेले नाही. त्यांनी दिलेले एकही आश्‍वासन त्यांनी पाळलेले नाही. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. तसेच दिल्ली येथे शेतकऱ्यांनी आंदोलन तब्बल वर्षभर आंदोलन केले तर त्याकडे दुर्लक्ष केले, असेही पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi जनतेसाठी काहीही करीत नाहीत. परंतु विरोधकावर टीका करणे हा त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे. या देशासाठी ज्यांनी आपले सर्व काही दिले, त्या पंडित नेहरूंवर ते सतत टीका करीत आहेत. गांधी घराण्याने या देशासाठी बलिदान दिले आहे. त्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावरही ते बोलतात. माझ्यावर आणि उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर टीका केल्याशिवाय तर त्यांना झोप येत नाही, अशा शब्दात पवारांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदी हे सत्तेचा दुरूपयोग करीत असल्याचा आरोप पवारांनी केला. झारखंडचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध वक्तव्य केले, त्यांनी त्यांना बोलावून विचारले पाहिजे होते. तसेच त्यांची समस्या दूर करायला पाहिजे होती. मात्र तसे न करता त्यांना कारागृहात टाकले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांनाही कारागृहात टाकले. हा सत्तेचा दुरूपयोग आहे. शेतकऱ्यांसाठी, युवकासाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी कोणतेही काम न करता केवळ सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना देशातील जनतेने या निवडणुकीत धडा शिकवावा, असे अवाहनही पवारांनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT