Congress agitation on Bharat Bandh
Congress agitation on Bharat Bandh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी

Sampat Devgire

घोटी : देशात केंद्र सरकारने (Centre Government) शेतकरी, (Farmers) बेरोजगार (Unemployment) युवक (Youth) व कामगारांसह (Workers) सर्वसामान्यांना महागाईच्या (Inflation) खाईत लोटून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्र महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत नाही. या विरोधात उग्र स्वरूपात आंदोलन (Agitation) करण्याचा इशारा (Warns) आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी दिला.

शेतकरी कायद्यांविरोधात विविध राजकीय पक्षांतर्फे आजभरात बंदचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी शहरात फेरी काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतकरी व सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. सुज्ञ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावताना केंद्र सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी उभे राहिले पाहिजे. अन्यथा देशात खासगीकरण होऊन सर्वसामान्य माणूस नेस्तनाबूत व्हायला वेळ लागणार नाही. आठ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहे. शेकडो आंदोलक शहीद झाले आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवतोय हे पाप एक दिवस उलटणार हे केंद्राने लक्षात ठेवावे. तिन्ही कृषी कायद्यांना आमचा विरोध असून, ते केंद्र सरकारने मागे घ्यावेत.

भारत बंद व केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात घोटी बसस्थानक येथे झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनादरम्यान सोमवारी (ता. २७) बोलत होते. काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, ‘सीटू’चे जिल्हा नेते देवीदास आडोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे, उत्तम भोसले, ॲड. संदीप गुळवे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, निवृत्ती कातोरे, युवक नेते भास्कर गुंजाळ, ईश्वर सहाणे, जगन जगताप, समता परिषदेचे अध्यक्ष शिवा काळे, सीटूचे तालुकाध्यक्ष दत्ता राक्षे, चंद्रकांत लाखे, चंद्रकांत दुभाषे, आप्पा भोले आदींसह सीटू, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

महामार्गावर आंदोलन

मुंबई-नाशिक महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मात्र नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी रास्ता रोको बंद करत निवेदन स्वीकारत शासनाच्या भूमिकेला आंदोलकांनी सहकार्य केले. केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात सर्वच पदाधिकाऱ्यांनी भाषणात ताशेरे ओढले. दरम्यान वाढलेली महागाई, बेरोजगारी, प्रकल्पबधितांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारला धारेवर धरले. भाषणांनंतर बसस्थानक ते भंडारदरा चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांना सर्वपक्षीय निवेदन देत मोर्चाची सांगता झाली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT