Nagpur Zilha Parishad Sarkarnama
विदर्भ

Nagpur BJP : नागपूर जिल्हा परिषदेत भाजप अशी करणार एन्ट्री!

Nagpur Zilla Parishad : नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे एकूण 32 सदस्य आहेत. त्या खालोखाल भाजप 14 आणि शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 सदस्य आहेत. राष्ट्रवादी दोन गटात विखुरल्या गेली आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांचे जिल्ह्याचे 'आका' सुनील केदारांच्या पत्नीचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला आहे.

Rajesh Charpe

Nagpur News, 17 Jan : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्याने आता भाजपने नागपूर जिल्हा परिषदेवर (Nagpur Zilha Parishad) पक्षाचा झेंडा फडकावण्याचा संकल्प केला आहे. नागपूर ग्रामीणमधील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. यात दोन मंत्री आहेत.

यातच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी कामकाजाचा आढावा घेण्याच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत एन्ट्री करून मिशन लोटसचे स्पष्ट संकेत दिले आहेत. नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ आज संपुष्टात येत आहे. उद्यापासून संपूर्ण कारभाराची सूत्रे प्रशासकाच्या हाती जाणार आहे. याच दिवशी बावनकुळे यांनी आढावा घेतला. त्यांनी निवडणुकीचा आणि आपल्या बैठकीचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले तरी यामुळे राजकीय धुरळा उडाला आहे.

सध्या नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे (Congress) एकूण 32 सदस्य आहेत. त्या खालोखाल भाजप 14 आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 सदस्य आहेत. राष्ट्रवादी दोन गटात विखुरल्या गेली आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांचे जिल्ह्याचे 'आका' सुनील केदारांच्या पत्नीचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांच्या सावनेर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या आशिष देशमुखांनी ताब्यात घेतला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत केदारांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी मंत्री रमेश बंग यांच्यावर उमेदवारी घेण्यास दबाव टाकला होता. काँग्रेसचे बंडखोर उभे केले होते. मात्र, बंग यांनी त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. बंग यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य आहेत. केदारांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांना सभापती होऊ दिले नाही.

शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनासुद्धा काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघ गमावावा लागला. येथूनच भाजपचे (BJP) चरणसिंग ठाकूर विजयी झाले आहेत. देशमुख आणि केदारांचेसुद्धा राजकीय वैर आहे. देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत केदारांनी त्यांना मदत केली होती.

मात्र, जिल्हा परिषदेत ते मोठे होणार नाही याची पाच वर्ष त्यांनी घेतली होती. आघाडी असतानाही केदारांनी जिल्हा परिषदेत सत्ता आली असता राष्ट्रवादी काँग्रेसला सभापतीपद देण्यास स्पष्ट नकार दिला होता. विधानसभेच्या निवडणुकीत केदारांचे राजकीय वर्चस्व मोडीत करण्याच भाजप यशस्वी ठरली आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या समर्थकांना संपवण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहे.

भाजपच्या या मोहिमेला केदारांच्या दादागिरीने कंटाळलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचीसुद्धा छुपी साथ मिळणार असल्याचे बोलले जाते. दहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर जिल्हा परिषदही भाजपला गमवावी लागली होती. राज्यातील सत्तेचा मोठा परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झाला होता.

आता राज्यात भाजप महायुतीची सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे नागपूरचे आहेत. भाजपला नागपूर जिल्हा परिषदेत कमबॅक कराण्यासाठी याचा फायदा होणार आहे. सोबतच काही दमदार व विजयाचे मेरिट असलेल्या काँग्रेसचे सदस्य आणि काही इच्छुकांना भाजपात आणण्याचे प्रयत्न जोरात सुरू

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT