Jitendra Awhad on Shree Ram. Sarkarnama
विदर्भ

Ayodhya Ram Mandir : श्रीराम मंदिर लोकार्पणाची घाई केवळ निवडणुकीमुळेच!

प्रसन्न जकाते

Jitendra Awhad : हिंदू धर्माचे चार शंकराचार्य ओरडून सांगत आहेत, की अयोध्येतील श्रीराम मंदिराची वास्तू अपूर्ण आहे. श्रीरामनवमी अर्थात रामाचा जन्मोत्सवही जानेवारीत नाही. असे असतानाही 22 जानेवारीला होणारी प्राणप्रतिष्ठा केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवत होत आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलाताना आव्हाड यांनी 22 जानेवारी आणि श्रीरामाचा कोणताही संबंध नसल्याकडे लक्ष वेधले. चारही शंकराचार्यांना हिंदू धर्मात मोठे स्थान आहे. त्यांचे म्हणणेही भाजप ऐकत नसल्याने भाजपचे पंचांग आणि कॅलेंडर वेगळेच असल्याची टीकाही आव्हाड यांनी केली. भाजपवालेच पंचांगकर्ते आणि कॅलेंडरकर्ते झाल्याचे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्या आणि रामाच्या नावाने वातावरणनिर्मितीचे नियोजन होतेच, असा दावा त्यांनी केला. त्यामुळेच 22 जानेवारीची तारीख निवडली. 22 जानेवारीचा आणि रामाचा काही संबंध आहे का? असा सवाल आव्हाड यांनी केला. श्रीराम हे बहुजनच आहेत, असे आव्हाड यांनी सांगितले. राम क्षत्रिय आहेत. जर कोणी म्हणत असेल राम क्षत्रिय नव्हते, तर ते कोण होते हे भाजपने सांगावे. क्षत्रिय असल्याने राम बहुजन ठरतात, असेही आव्हाड अत्यंत ठामपणे म्हणाले.

भारतात बहुजनांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे राम बहुजनांचे आहेत. भाजप रामावर कॉपीराइट सांगत आहे, त्यांचे हे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही सर्व बहुजन आहोत. आम्ही मांसाहार करतो. त्यामुळेच आपण रामाबद्दल बोललो होतो. यासंदर्भात आपण खेदही व्यक्त केला. त्यानंतर आपण कोणतेही वक्तव्य केले नाही, असे आव्हाड यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपाकडून मटणाची तुलना शेणाशी केली जाते. मटण खाणाऱ्या माणसाला भाजप शेण खाणारा म्हणते. असे असेल तर देशातील 80 टक्के लोक शेणच खातात. भाजपमधील जे लोक मटण खातात तेदेखील शेणच खातात, असे टीकाकारांना म्हणायचे आहे काय, असा सवालही आव्हाड यांनी केला.

आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच निकाल जाहीर केला आहे. हा निकाल म्हणजे दिल्लीत टाइप केलेल्या स्क्रिप्टचे वाचन होते. नार्वेकर यांनी पक्षाची निष्ठा जपली आहे. त्यांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे केले. नार्वेकर असाच निकाल देतील, हे अपेक्षित होते. सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल हेही अपेक्षित होते, असे आव्हाड म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT