Vijay Wadettiwar Devendra Fadnavis and Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Wadettiwar attack on government anniversary : ‘लाडकी बहीण ते लाडका कंत्राटदार' राज्य सरकारच्या वर्षपूर्तीचे वडेट्टीवारांनी काढले वाभाडे

Political criticism News : लाडक्या बहिणीपासून सुरू झालेला प्रवास आता लाडक्या कंत्राटदारापर्यंत येऊन पोहोचला आहे, असे सांगून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार सरकारच्या वर्षपूर्तीचे वाभाडे काढले.

Rajesh Charpe

Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी चांगलीच लाभदायी ठरली. लोकसभेच्या निवडणुकीतील सारे अपयश धुवून काढत पुन्हा महायुतीने सत्तास्थापन केली. या सरकारने आता वर्षपूर्ती केली आहे. मात्र या सरकारचा लाडक्या बहिणीपासून सुरू झालेला प्रवास आता लाडक्या कंत्राटदारापर्यंत येऊन पोहोचला आहे, असे सांगून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार सरकारच्या वर्षपूर्तीचे वाभाडे काढले.

महाराष्ट्रात पाच कंत्राटदारांमध्ये कोट्यवधींचे कंत्राटे मिळवण्यासाठी आपसात स्पर्धा सुरू आहे. एक लाख 67 हजार कोटीचे कामे त्यांच्यासाठी काढण्यात आली आहेत. या कंत्राटदारांसाठी कामे काढली जातात काय ? अशी शंका निर्माण झाली आहे. वर्षभरात असे कोणते दिवे लावले, चांगली कामगिरी की त्यांचे अभिनंदन करायचे असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला.

राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. मात्र मदतीसाठी अद्याप केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नाही. राज्याकडून प्रस्ताव आला नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री यांनी लोकसभेत सांगितले. त्यानंतर आम्ही प्रस्ताव पाठवला, असे खोटे सांगण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना वाट बघण्यास सांगण्यात आले. कर्जमाफी दिली जाईल, यावर कोणालाच विश्वास नाही. केंद्राकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी हे सरकार प्रस्ताव पाठवू शकत नाही ते कर्जमाफी काय देणार असेही वडेट्टीवार म्हणाले.

जातीजाती आणि धर्माधर्मांमध्ये भांडणे लावण्‍यासाठी या सरकारने काही कारटी पोसून ठेवली आहेत. ते कुठल्याही विषयाचा धर्माशी संबंध जोडतात. संपूर्ण महाराष्ट्राचे वाटोळे करायला हे सरकार निघाले आहे. महागाईवर नियंत्रण या सरकारला ठेवता आले नाही. कापूस सात हजार रुपये क्विंटलने विकत घेतला जात आहे. धानाला भाव दिला जात नाही. वर्षभरात महाराष्ट्राला अधोगतीकडे या सरकारने नेले आहे. सरकारच्या वर्षभराची कामगिरी काळी असून मार्क देण्याचा लायकीसुद्धा नाही, अशी बोचरी टीका वडेट्टीवार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT