Bachu Kadu -Sushma Andhare
Bachu Kadu -Sushma Andhare Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu News :आमच्यासारख्याला वाटतंय की शिवसेनेत पुन्हा गेलं पाहिजे : बच्चू कडू असं का म्हणाले?

Vijaykumar Dudhale

अमरावती : सुषमा अंधारे या आताच शिवसेनेत आल्या आहेत. त्या भाषणही चांगलं देतात. त्यांची भाषण देण्याची शैली, त्यांचा अभ्यास एवढा चांगला आहे की, आमच्यासारख्याला वाटतंय की चाललं जायला पाहिजे डब्बल शिवसेनेत (शिवसेनेत पुन्हा गेले पाहिजे). एवढ्या चांगल्या आहेत, आमच्या अंधारेताई, अशा उपाहासात्मक शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा समाचार घेतला. (MLA Bachu Kadu criticizes Sushma Andhare)

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अमरावतीच्या सभेत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर टीका केली हेाती. त्याला कडू यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, सुषमा अंधारे यांचा अचलपूरचा अभ्यास थोडा कमी आहे. त्यांनी सांगितलं की शिवसेनेने मला मदत केली. माझ्या विरोधात शिवसेनेकडून अनंत गुडे उभे होते, त्यांना १९ हजार मते मिळाली आणि डिपॉझिट जप्त झाले, हे सुषमाताईंना माहिती नाही.

सुरेखा ठाकरे माझ्याविरोधात शिवसेनेकडून लढल्या, त्यांना ३५०० मतं मिळाली, त्यांचंही डिपॉझिट जप्त केले. त्यानंतर शिवसेनेकडून लढलेल्या सुनीता फिसके यांचंही डिपॉझिट जप्त केलं. असं असूनही सुषमा अंधारे म्हणतात, बच्चू कडूंना शिवसेनेने मदत केली. शिवसेनेचे उमेदवार उभा करून आम्हाला मदत करता का? ताई. म्हणजे तुम्ही शिवसेनेच्या उमेदवारांसोबत बेईमानी केली नाही का? ही बेईमानी केली नाही, पाहिजे ना. शिवसैनिकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मत दिलं नाहीत, तर बच्चू कडूला मत मारलं आहे, अशी खिल्लीही त्यांनी अंधारेंची उडविली.

खरं त्यावेळी सामान्य शिवसैनिक आमच्यासोबत होते. माझ्याविरोधात शिवसेनेचे तीनवेळा उमेदवार उभे होते. मी चार वेळा निवडून आलो. मग सांगा मला शिवसेनेने मदत कशी केली? आता त्या उमेदवारांनी म्हणजे अनंतराव गुडे यांनी सुषमा अंधारे यांना विचारले पाहिजे की, बंडखोरी का केली.? आम्हाला उभं करायचं आणि मदत बच्चू कडूला करायाची? हा थोडा अभ्यास अंधारे यांचा कमी पडला.

आर आर आबा, पवारांची मदत

फिनले मिलसंदर्भात बच्चू कडूंनी अंधारे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, फिनले मिलसंदर्भातही सुषमा अंधारे यांचा अभ्यास कमी आहे. फिनले मिलच्या वेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी शरद पवार यांनी आम्हाला मदत केली होती. स्वतः आर. आर. पाटील हे दिल्लीला आले होते. त्यावेळी शंकरसिंह वाघेला हे वस्त्रोद्योग मंत्री होते, त्यांना भेटून शिफारसपत्र आणले, त्यावेळी ती मिल सुरू झाली. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी ती मिल बंद पडली. त्यासंदर्भात मी ठाकरेंना भेटलो. केंद्राशी संपर्क साधा. एखाद्या बैठक घ्या. पण त्यांनी बैठकसुद्धा घेतली नाही, असा आरोपही कडू यांनी केला.

गडकरी, फडणवीसांनी पुढाकार घ्यावा

नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांना भेटून संत्र्यांची ब्रॅंडिंग करण्यासाठी पत्र दिले हेाते. मात्र, त्यानंतर पुढं काय झालं, मला माहिती नाही. पण, त्याबाबत आता गडकरी आणि फडणवीस यांनी निर्णय घेणे महत्वाचे आहे, असेही आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT