Buldana News : एल्गार रथयात्रा म्हणजे सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठीची आरपारची लढाई आहे. या रथयात्रेला मेहकर-लोणार तालुक्यात मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. शेतकरी-शेतमजूर बांधवांच्या मनात आपल्या हक्कासाठी निर्माण झालेली आग निश्चितच सरकारला हादरा देणारी राहणार आहे, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले. मेहकर-लोणार तालुक्यातील विविध गावांत त्यांनी शेतकरी शेतमजूर व तरुणांशी संवाद साधला.
कापूस - सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सुरू असलेली 'एल्गार यात्रा' चौथ्या दिवशी मेहकर तालुक्यातील जनुना, विठ्ठलवाडी, पांगरखेड, गोहगाव दांदडे, डोणगाव, खंडाळा, अंत्री देशमुख चिंचोली बोरे, लोणार तालुक्यांतील सुलतानपूर, रांजणी, जांबूल, मांडवा या गावात यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या कोणी वाली उरलेला नाही. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांबाबत ब्र शब्दही कोणी काढायला तयार नाही. त्यामुळे आता आपल्यालाच आपली लढाई लढावी लागणार आहे. एल्गार रथयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ताकद एकत्र करून २० नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात शेतकऱ्यांचे वादळ धडकणार आहे, यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहनदेखील रविकांत तुपकर यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.